Amitabh Bachchan Onscreen Son Birthday: टेलिव्हिजन कलाकारही प्रेक्षकांच्या मनावर तितकेच अधिराज्य घालत असतात. जितके बॉलिवूडचे कलाकार त्यांच्यावर घालतात. अनेकदा त्यांचीही भरपुर चर्चा रंगलेली असते. मालिका या कधी महिनोम् महिने चालतात तर कधी वर्षांनुवर्षे चालत असतात. या मालिकांतून विषयही असे हाताळले जातात की कशाचाच कशाशीही संबंध नसतो. त्यातून मालिकांमध्ये असलेला भरपुर मेलोड्रामाही आपल्यालाही पाहायला मिळतो. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका अभिनेत्याची. या अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. त्याचसोबत याची जोरात चर्चाही रंगलेली पाहायला मिळते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला आठवतचं असेल की स्टार प्लस ही वाहिनी 2000 च्या काळात प्रचंड लोकप्रिय होती. त्याचसोबत तेव्हाच्या मालिका या प्रचंड लोकप्रिय व्हायच्या. त्यामुळे या मालिकांची तेव्हा प्रचंड लोकप्रिय होती. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे याच एका मालिकेतील एका अभिनेत्याची. 


तुम्हाला अमन वर्मा हा अभिनेता आठवतो आहे का? 'क्यूंकि सास भी कभी बहू थी', 'खुल जा सिम सिम', 'कुमकुम', 'जस्सी जैसी कोई नहीं' अशा काही लोकप्रिय चित्रपटांतून तिनं कामं केली आहेत. अमन वर्मा यानं अमिताभ बच्चन यांच्या 'बागबान' या चित्रपटातूनही त्यांच्या मुलाचा रोल केला होता. जो काहीसा नकारात्मक होता. अमन वर्मा यानं बरेच दिवस टेलिव्हिजन माध्यमातून कामं केली आहेत. त्यानंतर तो बरेच दिवस मराठी चित्रपटसृष्टीपासून दूर होता. अमन वर्माचा आज 11 ऑक्टोबरला 52 वा वाढदिवस आहे. त्यामुळे त्याची चर्चा रंगलेली आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार, जी त्याची बहीण होती तिच्याशीच त्यानं लग्न केले होते. म्हणजेच आपल्या ऑनस्क्रीन बहीणीशीच त्यानं लग्न केले. परंतु त्यानंतर त्याला पुन्हा एकदा लग्न करावे लागले होते. नक्की काय होता हा किस्सा आपण जाणून घेऊया. 


हेही वाचा : Amitabh Bachchan Bday: एकाच विमानातून प्रवास; रेखा आणि अमिताभ यांच्या 'त्या' 'सिलसिल्या'ची गोष्ट


अमन वर्मा यानं अभिनेत्री वंदना लालवानी हिच्याशी 14 डिसेंबर 2016 साली लग्न केले. त्या दोघांनी एकत्र 'शपथ' या टीव्ही शोमध्ये काम केले होते. ज्यात ती त्याची ऑनस्क्रीन बहीण होती. त्यावेळी त्यानं या मुलाखतीतून सांगितलं होतं की त्यानं वंदनाशी सेटवर मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु स्क्रीनवर भाऊ-बहीणीचं नातं असल्याकारणानं ते त्याचप्रमाणे राहायचे. मग त्यांच्यात प्रेमही वाढू लागले. 2015 साली फारच घाईगडबडीत त्या दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर 2016 साली त्यांच्या लग्नाची तारिख आली. त्यांनी याच इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की मेहेंदी आणि संगीताची सेरेमनी झाली होती. परंतु त्यानंतर लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे फारच साधारण पद्धतीनं त्यांची आणि अमन वर्मा व वंदना यांचे लग्न झाले. त्यानंतर त्यांचे लग्न हे पोस्टपॉन झाले आणि त्याचदिवशी त्यांनी 14 डिसेंबर रोजी पुन्हा लग्न केले.