Amitabh Love Life : बॉलीवूडमधील कलाकारांचे प्रेम प्रकरणं खूप चर्चेले जातात. यातील सर्वात प्रसिद्ध प्रेम कहाणी आहे ती म्हणजे रेखा आणि अमिताभ बच्चन यांची. पण रेखा आज एकट्या आयुष्य जग आहेत. तर अमितभा बच्चन यांचं लग्न जया भादुरी यांच्याशी झालं आहे. बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ  (Amitabh Bachchan birthday) यांनी त्यांच्या अभिनय आणि दमदार आवाजाने आजही बॉलीवूड गाजवत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात आधी रेखा आली की जया बच्चन (Jaya Bachchan), नेमकं बी बिग यांचं पहिलं प्रेम कोण होती. (amitabh bachchan first love maharashtrian Girl before becoming jaya and Rekha love story)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, अमिताभ हे जेव्हा सिनेसृष्टीत येण्यासाठी धडपड करत होते तेव्हा त्यांची पुण्यात जया बच्चन यांच्याशी ओळख झाली. जया बच्चन या त्यावेळी सिनेसृष्टीत प्रसिद्ध होत्या. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अमिताभ बच्चन यांना भेटण्यापूर्वी जया बच्चन आणि रेखा या जीवलग मैत्रिणी होती. एवढंच नाही तर त्या एकाच बिल्डिंगमध्ये राहत होत्या. जया बच्चन यांच्याशी लग्न झाल्यानंतर रेखा यांची अमिताभ बच्चन (Love story) यांच्या आयुष्यात एन्ट्री झाली. 



ना Rekha, ना जया, 'या' तरुणीच्या प्रेमात होते बिग बी!


पण अनेकांना माहिती नाही की, जया आणि रेखा नाही तर एका महाराष्ट्रीय तरुणीच्या (Maharashtrian woman) प्रेमात अमिताभ बच्चन होते. अमिताभ बच्चन यांच्या मित्र दिनेश कुमार यांनी याबद्दल खुलासा केला आहे. अमिताभ मराठी तरुणी चंद्रा या तरुणीवर प्रेम करत होते. अमिताभ यांना चंद्रा यांच्याशी लग्नही करायचं होतं. अमिताभ आणि चंद्रा कोलकत्यातील ब्रिटीश कंपनी ICI मध्ये एकत्र काम करत होते. खरं तर त्या दोघांची पहिली भेट थिएटरमध्ये नाटक पाहताना झाली होती.


त्या कंपनीत अमिताभ यांना 1500 रुपये तर चंद्राला 400 रुपये मासिक पगार होता. तीन वर्ष अमिताभ आणि चंद्रा याचं अफेयर होतं. त्यावेळी अचानक नोकरी सोडली म्हणून कंपनीने त्यांचा 26 दिवसांचा पगारही कट केला होता, असं त्याच कंपनीत काम करणारे अमिताभ यांचे मित्र दिनेश यांनी सांगितले. 


हेसुद्धा वाचा - Bollywood Legends : एकाच इमारतीत राहायच्या जया-रेखा, Amitabh Bachchan नव्हे तर 'हा' होता त्या दोघींचा कॉमन फ्रेंड


ते पुढे म्हणाले की, चंद्रा यांनी अमिताभ यांनी आधी लग्नासाठी होकार दिला होता. पण त्यानंतर चंद्रा यांनी नकार दिला. अनेक प्रयत्न करुनही दोघांमध्ये बोलणं होऊ शकलं नाही. काही दिवसानंतर  चंद्रा ब्रिटीश रेल्वेमध्ये काम करणाऱ्या तिच्या मोठ्या बहिणीसोबत वर्ल्ड टूरवर निघून गेली. अमिताभ यांनी 1968 मध्ये कोलकातामधील नोकरी सोडली.  चंद्रा यांनी लग्नाला नकार दिला म्हणून अमिताभ यांनी ती नोकरी आणि शहर सोडलं. अमिताभ बच्चन यांच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर चंद्रा यांनी बंगाली चित्रपटांच्या प्रसिद्ध अभिनेत्याशी लग्न केलं.