Amitabh Bachchan Never Accepted Aishwarya As Daughter In Law : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे अभिनय क्षेत्रातील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. त्यांच्या लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाले आहेत. पण या सगळ्यात त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. अंबानी कुटुंबातील लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली होती. अभिषेक-ऐश्वर्यात सर्वकाही ठीक नाही असं म्हटलं जातं. अशात ऐश्वर्या आणि अभिषेकची काही जुनी वक्तव्य चर्चेत आले आहेत. जया बच्चन यांना त्यांच्या सूनेविषयी काय विचार करतात आणि संपूर्ण कुटुंब तिच्याकडे कशाप्रकारे पाहतं यावर जया यांनी स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा अभिषेक-ऐश्वर्या यांचं नुकतंच लग्न झालं होतं. त्यानंतर जया बच्चन यांनी करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावली होती. तेव्हा ऐश्वर्यासोबत कुटुंबाचं नातं कसं आहे यावर मोकळेपणानं वक्तव्य केलं आहे. ही सगळी चर्चा सुरु असताना जया यांनी सांगितलं की 'लेक श्वेताच्या लग्नानंतर अमिताभ यांच्या आयुष्यात एकटेपणा आला होता. तो एकटेपणा ऐश्वर्यानं भरून काढला. ऐश्वर्या आल्यानंतर घरातील मुलीची कमी भरून निघाली.' त्यांनी पुढे सांगितलं की 'अमिताभ यांनी देखील ऐश्वर्याला सून मानलं नाही तर कायम मुलगीच मानलं.' 


दरम्यान, अभिषेकची बहीण श्वेता बच्चननं 'कॉफी विथ करण'मध्ये ऐश्वर्याची खूप स्तुती केली होती. श्वेतानं म्हटलं की 'ऐश्वर्या खूप चांगली आई आहे. ती ज्या प्रकारे आराध्यावर लक्ष ठेवते. ते पाहून खरंच विश्वास बसत नाही.' त्याशिवाय तिनं हे देखील सांगितलं की 'ऐश्वर्या तिच्या मुलांमध्ये आणि आराध्यामध्ये कोणताही भेदभाव करत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे.' 


अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाची चर्चा


ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये त्यानं एका घटस्फोटाच्या पोस्टला लाईक केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. दुसरीकडे या सगळ्या चर्चा सुरु असतानाच ऐश्वर्या आराध्याला घेऊन न्युयॉर्कमध्ये फिरायला गेली होती. तिथला तिचा आणि तिच्या एका चाहतीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी ऐश्वर्या ही आराध्यासोबत नाही का अशी देखील चर्चा रंगली होती. दरम्यान, आता ऐश्वर्या आणि आराध्या भारतात परतल्या आहेत.