मुंबई : मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. अमृताच्या अभिनयाचे आणि डान्सचे लाखो चाहते आहेत. अमृतानं तिच्या अभिनयाच्या जोरावर फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वत:ची ओळख निर्माण केली. अमृतानं बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. त्या यादीत 'सत्यमेव जयते', 'मलंग' आणि 'राझी' हे चित्रपट आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक सेलिब्रिटीज विवाह बंधनात अडकत आहेत. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा देखील नुकतंच लग्नबंधनात अडकले आहेत. नुकतीच त्यांनी आपल्या मित्र परिवारासाठी रिसेप्शन पार्टीचं देखील आयोजन केलं होत.  एकीकडे सिनेसृष्टी या जोडप्याच्या एकत्र येण्याचा आनंद साजरा करत आहे. चाहते या सर्वच नवदांपत्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.


तर दुसरीकडे काही सेलेब्रिटी वेगळे होत आहेत. यातच आता मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने असेच काहीसे संकेत देत, तिच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. 


2022वर्षात मराठी सिनेसृष्टीतील एका सिनेमाची जोरदार चर्चा झाली तो सिनेमा म्हणजे चंद्रमुखी. प्रसाद ओकचं दिग्दर्शन आणि अभिनेत्री अमृता खानविलकर, अदिनाथ कोठारे प्रमुख भूमिकेत असलेल्या या सिनेमानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सिनेमात अमृतानं चंद्रमुखी हे प्रमुख पात्र साकारलं होतं.


अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्राकडे सिनेसृष्टीमधे अतिशय गोड आणि सुंदर कपल म्हणून पाहिलं जातं. त्यांनी अनेकवेळा उघडपणे आपल्या नात्यात आलेल्या अडचणी आणि समस्यांबद्दल सांगितलं आहे.


त्यामुळे या बिनधास्त जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे. काही महिन्यांपूर्वीच अमृताने हिमांशू आणि आपल्या मित्रमंडळींसोबत जोरदार वाढदिवस साजरा केला होता. या पार्टीची सगळीकडेच जोरदार चर्चा रंगली होती. अमृता आणि हिमांशूमधलं प्रेम बघत अनेकांनी त्यांना परफेक्ट कपल म्हणत त्यांचं कौतुक देखील केलं होत.


मात्र आता एक थक्क करणारी बातमी समोर आली आहे. अमृताने आपल्याच नवऱ्याला म्हणजेच हिमांशूला सोशल मीडियावरून ब्लॉक केलं आहे. त्यामुळे त्यांच्यात सगळं आलबेल आहे की, नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॅाक शोमध्ये याबद्दलचा खुलासा खुद्द अमृताने केला आहे.


यापूर्वी अमृताने अनेकदा हिमांशुला ब्लॉक आणि अनफॉलो केले आहे. मात्र यावेळी हिमांशुने देखील अमृताला अनफॉलो केले आहे. इतकं टोकाला जाण्याच कारण काय, असा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. खरं तर त्यांच्यात नेमकं काय घडलं आणि आणि त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे का, याबद्दल चाहत्यांमध्ये प्रश्न उपस्थित झाले आहेत. या गप्पाटप्पांमध्ये दिग्दर्शक ओम राऊतही सहभागी झाला आहे. आणि यावेळी त्याने अमृता आणि त्याच्या नात्याचं सत्य सांगितलं आहे. ते दोघे एकमेकांचे 'बर्गर बडीज' असल्याचंही त्याने सांगितलं.