मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडे सध्या 'गहराइया' सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. सिनेमा पूर्णपणे रिलेशनशिप भोवती फिरताना दिसत आहे. 'गहराइया' सिनेमा अनेकांनच्या पसंतीस उतरला नाही. पण काहींना सिनेमा प्रचंड आवडला. एकदंर सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान अनन्या पांडेने खाजगी आयुष्यातील नातं आणि प्रेमाबद्दल वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोमाँटिक रिलेशनशिपबद्दल आता अनेकांची मानसिकता वेगळी आहे. असं मत अनन्याने व्यक्त केलं. अनन्या म्हणाली, 'मी लहानपणापासून शाहरुखचे अनेक सिनेमे पाहिले आहेत. त्यांच्या सिनेमातून माझ्या लक्षात आलं, की प्रेम हे मैत्रीपेक्षा फार मोठं आहे.'



एवढंच नाही तर यावेळी अनन्या रोमाँटिक रिलेशनशिपबद्दल मत व्यक्त करत म्हणाली, 'आता अनेक लोकांना भेटणं सहज सोप झालं आहे. तुम्हाला नात्यात तडजोड करायची नसते, त्यात काही गैर देखील नसतं. अशा नात्यात आपण आनंदी राहू शकत नाही. ज्यामध्ये आपलं गोष्टींकडे दुर्लक्ष होईल. 


अशा नात्याचा परिणाम आपल्या जीवनावर होईल.' असं देखील अनन्या म्हणाली. 'गहराइया' सिनेमात रिलेशनशिपमध्ये असलेली गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. सिनेमात अभिनेत्री दीपिका पादुकोण, अभिनेता  सिद्धांत चतुर्वेदी आणि  धैर्य करवा मुख्य भुमिकेत आहेत.