COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : अभिनेत्री सुरुची अडारकर, हर्ष मतकरी आणि पियुष रानडे यांची प्रमुख भूमिका असलेली अंजली या मालिकेचे नुकतेच ३०० भाग पूर्ण झालेत. या निमित्ताने या मालिकेच्या सेटवर ३०० भाग पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन करण्यात आले. गेल्या वर्षभरापासून ही मालिका सुरु आहे. या वर्षभरात मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न आले. पेशाने डॉक्टर असलेल्या या अंजली तरुणीची ही कहाणी आहे. या मालिकेत आणखी एका पात्राची एंट्री झालीये. रेश्मा शिंदे बेला नावाचे पात्र साकारणार आहे. या मालिकेत ती नव्याने दिसणार आहे. या मालिकेबाबत बोलताना सुरुची म्हणाली, जेव्हा या मालिकेला सुरुवात झाली होती तेव्हा पहिल्या दिवसापासून भिती होती कसं होईल, काय होईल. पण मला वाटतं की ३०० एपिसोडपर्यंत येणं सोप नाहीये. मात्र झी युवाने हे केलंय. त्यामुळे श्रेय साऱ्यांनाच जाते. छान वाटतंय. ३०० भाग पूर्ण झालेत.