मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सिनेसृष्टीत नवोदित कलाकार म्हणून ओळख मिळवत आहे. तसेच कार्तिक आर्यनचा अतिशय मनमोकळा स्वभाव आणि क्रेझी चाहता वर्ग ही त्याची खास गोष्ट आहे. मात्र कार्तिक सध्या आणखी एका गोष्टीवरून चर्चेत आहे. (Anubhav Sinha says this Campaign against Kartik Aaryan seems concerted to me and very bloody affair ) एकवेळ अशी होती जेव्हा कार्तिककडे खूप प्रोजेक्ट होते पण या सगळे आगामी प्रोजेक्टस त्याने गमावले आहेत. 



अऩुभव सिन्हा यांनी केलं ट्विट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमा दिग्दर्शक अनुभव सिन्हाने यावर ट्विट करताना म्हटलंय की,'एक गोष्ट सांगतो. जेव्हा एखादा निर्माता अभिनेत्याला ड्रॉप करतो तेव्हा त्याला यावर बोलायचं नसतं. अगदी दोघांनाही यावर बोलायचं नसतं. असंच आतापर्यंत पाहण्यात आलंय. कार्तिक आर्यनच्या विरोधात कॅम्पेन चालवण्यात येत आहे. हे खूप चुकीचं आहे. कार्तिक आर्यनच्या शांत स्वभावाचं कौतुक करतो मी.'


सगळ्यात अगोदर करण जोहरच्या 'दोस्ताना 2' सिनेमातून काढून टाकलं आहे. त्यानंतर त्याला आनंद एल रायच्या सिनेमातून देखील काढल्याच्या चर्चा रंगल्या. या सगळ्यावर फिल्ममेकर अनुभव सिन्हा यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 


आनंद एल राय यांच्या सिनेमातून कार्तिक बाहेर? 



काही दिवसांपूर्वीच अशी माहिती मिळाली की, कार्तिक आर्यनला आनंद एल राय यांनी आपल्या सिनेमातून काढलं आहे. मात्र आनंद एल राय यांनी ही चुकीची माहिती असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, कार्तिक आर्यनला कधीच त्यांनी आपल्या कोणत्या आगामी सिनेमात साइन केलेलं नाही. 


या गोष्टीची चर्चा तेव्हा झाली जेव्हा करण जोहरने धर्मा प्रोडक्शनच्या 'दोस्ताना 2' सिनेमातून कार्तिक आर्यनला काढण्यात आलं. याबाबत धर्मा प्रोडक्शनने ऑफिशिअल स्टेटमेंट देखील जाहीर केलं आहे. त्यानंतर अशी देखील चर्चा रंगली की, त्याला शाहरूख खानच्या रेड चिलीज प्रोडक्शन हाऊसमधून देखील काढण्यात आलं.