मुंबई : झगमगत्या इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक  दुःखद बातमी समोर येत आहे. अभिनेता ऋतुराज सिंग यांचं वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झालं आहे. 19 फेब्रुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालंय. काल सोमवारी अभिनेत्याने रात्री अखेरचा श्वास घेतला आहे. या अभिनेत्याने 'अपनी बात', 'ज्योती', 'हिटलर दीदी', 'शपथ', 'वॉरियर हाय', 'आहट', 'अदालत', 'दिया और बाती' यांसारख्या हिट मालिकेत महत्वपुर्ण भूमिका साकारल्या आहेत. याचबरोबर ते अनुपमा मालिकेत शेवटचे दिसले. अनुपमा मालिकेत त्यांनी रुपाली गांगुलीसोबत स्क्रिन शेअर केली होती. या मालिकेत त्यांनी एका रेस्टारंटच्या मालकाची भूमिका साकारली होती.