इटली  : बॉलिवू़डची चुलबुली गर्ल अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार विराट कोहली इटलीमध्ये रेशीमगाठीत अडकले आहेत..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरुष्काच्या शाहीविवाह सोहळ्याला सुरुवात झाली असून 15 डिसेंबर पर्यंत हा लग्नसोहळा रंगणार आहे.  


चाह्त्यांंपासून दूर जाऊन हा लग्न सोहळा पार पडतोय. आज दुपारी त्यांंनी सात फेरे घेतले असून लवकरच मुंबई आणि दिल्लीमध्ये त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. लग्न झाल्यानंतर विराट आणि अनुष्कानं लगेचच ट्विटरवरून हे फोटो शेअर केले आहेत. 


 




 



 


इटलीतील टस्किनी शहरामध्ये बेनकॉन्व्हॅन्टो या हॉटेलमध्ये या दोघांचा शाहीविवाह सोहळा संपन्न झाला..पूर्णपणे पंजाबी पध्दतीने या दोघांचा विवाह सोहळा पार पडला.. 26 डिसेंबरला मुंबईत ग्रॅण्ड ह्यात हॉटेलमध्ये या दोघांचं रिसेप्शन आयोजित केल्याचं म्हंटलं जातयं.. .


  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि क्रिकेटर युवराज सिंग यांची लग्नाला उपस्थिती असल्याचं म्हंटलं जातयं.. तर दुसरीकडे अनुष्का शर्माने निर्माता आदित्य चोप्रा, अभिनेता आमिर खान, शाहरुख खान आणि दिग्दर्शक मनीष शर्मा केवळ इतक्याच लोकांना निमंत्रण दिलं असल्याचं कळतंय.....