मुंबई : बॉलिवूडमध्ये आज अनेक कलाकारांनी खूप मोठं यश मिळवलं. मुंबईत राहायला घर नसतांना ही अनेकांनी येथे येऊन आज खूप नाव कमवलं. हालाकीच्या परिस्थितही अनेक कलाकारांनी त्यांचं ध्येय गाठलं. अॅवॉर्ड घेण्यासाठी असाच एक गायक जेव्हा चप्पल घालून स्टेजवर पोहोचला तेव्हा त्याची परिस्थिती काय असेल हे अनेकांच्या लक्षात आलं. आज तोच गायक एका गाण्यासाठी करोडो रुपये घेतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडचा गायक अरिजीत सिंग आज बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध गायकांच्या यादीत येतो. आपल्या आवाजाने आणि सुरांनी त्यांने अनेकांचं मन जिंकलं. आज त्याचे लाखो चाहते आहेत. अरिजीतने पहिलं गाणं 2011 मध्ये आलेल्या 'मर्डर 2' सिनेमामध्ये गायलं होतं. 'फिर मोहब्बत करने चला है तू...' हे त्याचं पहिलं गाणं. या गाण्यानंतर अरिजीत एका रात्रीत स्टार झाला. अरिजीतने हे गाणं 2009 मध्ये गायलं होतं. हे गाणं 2011 मध्ये रिलीज झालं तेव्हा याची त्याला कल्पना देखील नव्हती. त्याच्या एका मित्राने याची माहिती त्याला दिली.


अरिजीत आज 45 मिनिटांच्या गाण्यासाठी 1.5 कोटी रुपये घेतो. बॉलिवूडमध्ये एका गाण्यासाठी तो 16 लाख रुपये घेतो. अरिजीत खूपच साध्या पद्धतीने राहतो. लोकांमध्ये राहायला त्याला आवडतं.  सलमान खान एक अॅवॉर्ड शो होस्ट करत असताना अरिजीत सिंगला 'आशिकी-2' सिनेमातील गाण्यासाठी बेस्ट सिंगर नॉमिनेट केलं गेलं. तेव्हा तो झोपलेला होता. जेव्हा त्याला बाजुच्या व्यक्तीने उठवलं तेव्हा एक साधा शर्ट आणि चप्पल घालून तो स्टेजवर पोहोचला. सलमानला हे बिल्कुल आवडलं नाही. जेव्हा सलमानने त्याला विचारलं तू झोपला होतास का तेव्हा त्याने म्हटलं की, तुम्ही लोकांनी झोपवलं. हे उत्तर देणं अरिजीतला भारी पडलं. यानंतर त्याला सलमानची माफी मागावी लागली. सलमानने त्याच्या गाण्यांसाठी त्याला बॅन करुन टाकलं.