मुंबई : पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवीच्या अचानक झालेल्या निधनामुळे बॉलिवूडला जबर धक्का बसला. त्याही पेक्षा तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. यावेळी नेहमी दूर राहणारा सावत्र मुलगा अर्जुन कपूरही या दुःखात सहभागी झाला. अंतयात्रेतही तो मुलाचे कर्तव्य निभावताना दिसला. इतकंच नाही तर जान्हवी-खुशी या आपल्या सावत्र बहिणींचे सांत्वनही त्याने केले. आणि श्रीदेवी गेल्यानंतर पहिल्यांदाच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.


काय म्हणाला अर्जुन कपूर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, तुम्ही खूप बहादूर होतात. कारण की आयुष्यात हार मानण्याचे अनेक प्रसंग आले. पण तरीही, तुम्ही या परिस्थितींवर मात करून त्यातून बाहेर पडलात, स्वतःला सांभाळतं आणि पुढे चालत राहील्यात.



वडिलांच्या दुःखात सहभागी


२४ फेब्रुवारीला दुबईत श्रीदेवी यांचे निधन झाले. २७ फेब्रुवारीला पार्थिव मुंबईत आणून २८ फेब्रुवारीला त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. वडील बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्याशी फारसे चांगले संबंध नसताना अर्जुन आपल्या वडीलांच्या दुःखात त्यांच्या सोबत राहीला.