मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला रविवारी NCB अर्थात नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आली. अंमली पदार्थांचं सेवन, विक्री आणि ते पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला अटक करण्यात आलेल्या परिस्थितीची जाण असल्याचं म्हणत त्यानं सदर प्रकरणाची माहिती त्याच्या कुटुंबाला दिली. शनिवारी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका जहाजात एनसीबीच्या अधिकाऱ्यानी कारवाई करत अंमली पदार्थ जप्त केले होते.या प्रकरणात एकूण 8 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. तर 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलं.


आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीत अनेकांची नाव समोर आली आहेत. दरम्यान चौकशी सुरु असताना आर्यन ढसा-ढसा रडल्याचं  बोललं जातंय. त्याने आपल्या वडिलांना म्हणजेच शाहरुख खानला कॉल केल्याचं कळतंय. 2 मिनिट या दोघांमध्ये संभाषण झालं. 


वकिलांमार्फत शाहरुख आणि आर्यन एकमेकांसोबत बोलू शकले. आर्यन खानच्या अडचणीत वाढ झाल्याचं ही बोललं जात आहे. त्यामुळे आता शाहरुख यावर काय प्रतिक्रिया देतोय याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.


अरबाज मर्चंटवर NCB चे खास लक्ष  


NCB च्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी रेव पार्टी होणार होती. त्यावेळी त्याजागी 1200 ते 1300 लोकं उपस्थित होत. मात्र NCB त्या 1300 लोकांच्या गर्दीत त्यांना मिळालेल्या टिपनुसार 'त्या' 8 ते 10 लोकांच्या शोधात होती. त्यामध्ये आर्यन शाहरूख खानचं नाव देखील अगदी स्पष्ट होतं. आर्यन आणि अरबाज मर्चंटवर खास लक्ष ठेवण्यासाठी NCB चे अधिकारी तैनात होते. कारण या प्रकरणाची टीप NCB ला अगोदरच मिळाली होती.