मुंबई : रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. लोकप्रियतेचा शिखर गाठलेल्या बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेने नुकताच २०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला. नुकतेच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिले की दादासाहेबांच्या जागेवर विराजमान होत आईसाहेबांना आता सर्व सूत्र स्वतःच्या हातात घेतली आहेत. सध्या मालिकेत एक अनोखे वळण प्रेक्षकांनी पाहिले. शालूचा खरा चेहरा सगळ्या समोर आल्या नंतर शब्बीर आणि गीताला सन्मानाने वाड्यात आणल जातं. गीता त्यासाठी सूर्याचे आभार मानते. गीता वाड्यात नसताना  घर किती सुनं वाटायचं आणि तिची खूप आठवण येत असल्याची कबुली सूर्या गीताला देतो. पण हे आईसाहेब ऐकतात आणि सगळ्यां समोर सूर्या आणि गीताच्या लग्नाची घोषणा करतात.


रमाकांतला आई साहेबांनी परस्पर घेतलेला हा निर्णय आवडत नाही आणि म्हणून तो आईसाहेबांना हे लग्न करू नका असं मनवण्याचा प्रयत्न करतो. निशा गीताचं अभिनंदन  करते आणि हे हि म्हणते कि हे लग्न नीट पार पडला पाहिजे कारण वाड्याला शापच आहे कि लग्नाच्या दिवशी काहीतरी घडतं त्यामुळे गीता घाबरते. वाड्यात सूर्या गीताच्या लग्नाची तयारी सुरु होते. गीताला मेहंदी लावायच्या क्षणी आईसाहेब भावुक होतात आणि खोलीत दादासाहेबांच्या जुन्या वस्तू काढून बसतात जिथे गीता येते आणि त्यांना सांभाळते. गीताला दादासाहेबांनी एक डायरी सापडते ती वाचते. दोघी भावुक होतात - "आमचा निशावर  संशय आहे" हे लिहलेलं पान वाचायचं राहत. सूर्या आणि गीताचं लग्न सुरळीत पार पडेल का? निशाचं पुढचं पाऊल काय असेल? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका बापमाणुस सोमवार ते शनिवार 8.30 वाजता फक्त आपल्या झी युवा वर