मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे सेटवर आपल्या सहकलाकारांच्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांच्याशी लग्न केले. पण दुसरीकडे असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी बॉलिवूडपासून दूर असलेल्या व्यक्तीला जीवनसाथी म्हणून निवड केली. 90 च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या माधुरी दीक्षितने इंडस्ट्रीत आपल्या दमदार अभिनय आणि डान्सच्या जोरावर कमालीची ओळख मिळवली आहे. आज जरी माधुरी दीक्षित फिल्मी दुनियेपासून लांब असली तरी, अजुनही तिच्या चाहते लाखोंच्या संख्येने आहेत आणि तिने लोकांच्या मनावर राज्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे, माधुरीच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, करिअरच्या अगदी शिखरावर असताना तिने लग्न केले आणि त्यानंतर ती अभिनय जगतापासून कायमची लांब गेली.


माधुरीने अमेरिकेतील डॉक्टर श्रीराम नेनेशी लग्न केले. परंतु तुम्ही हे बऱ्याचदा पाहिले असेल की, अभिनय जगताशी निगडित स्टार्स अनेकदा आपल्यासारख्या कलाकारांशी लग्न करतात.


परंतु माधुरीने असं न करता. इंडस्ट्री बाहेरील व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. याबाबत माधूरीने सांगितलं की, तिचा इंडस्ट्रीवर फारसा विश्वास नव्हता. हेच कारण होते की, तिने इंडस्ट्रीबाहेरील व्यक्तीला तिचा जीवनसाथी म्हणून निवडले.


माधुरीच्या म्हणण्यानुसार तिला बॉलिवूड स्टार्सच्या मैत्रीवर फारसा विश्वास नाही. एकेकाळी माधुरी बॉलिवूड अभिनेत्री सिम्मी ग्रेवालच्या टॉक शोचा भाग बनली होती, ज्यामध्ये तिने इंडस्ट्रीशी संबंधित अनेक गोष्टी मांडल्या होत्या. दरम्यान, संभाषणात माधुरीने सांगितले होते की, अनेकदा तिची शूटिंग संपली की, इतर स्टार्ससोबत वेळ घालवण्याऐवजी ती घरी जायची.


माधुरीने पुढे सांगितले की, ती बॉलिवूड स्टार्सपासून अंतर ठेवायची आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याऐवजी तिच्या शाळेतील मैत्रिणींसोबत वेळ घालवण्यात तिला जास्त आनंद वाटायचा. ती तिच्या मैत्रिणींसोबत खूप एन्जॉय करायची आणि याविषयी पुढे बोलताना माधुरी म्हणाली की, 'तुम्ही इंडस्ट्रीत कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. आणि विशेषतः मैत्रीच्या बाबतीत अजिबात नाही.'


त्याचवेळी माधुरीने तिचा जोडीदार डॉ.श्रीराम नेने यांच्याबद्दल सांगितले की, माधुरी जेव्हा त्यांना भेटली तेव्हा त्यांना माधुरीबद्दल काहीच माहिती नव्हती. माधुरी ही हिंदी चित्रपट जगतातील एवढी मोठी अभिनेत्री आहे, हेही त्यांना माहीत नव्हते. तरी देखील त्यांनी माधूरीवरती मनापासून प्रेम केलं. हे एक मुख्य कारण होते की, माधुरीने त्याच्याशी लग्न केले जेणेकरून तिच्या पतीने तिला इतर भारतीय पुरुषांसारखे स्टार म्हणून पाहणार नाही किंवा त्यासाठी तिच्याशी लग्न करणार नाही.


याशिवाय डॉ.श्रीराम नेने यांच्या साध्या आणि सरळ स्वभावाने माधुरी खूप प्रभावित झाली होती. माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी 1999 मध्ये लग्न केले आणि आज या जोडप्याने एकत्र 21 वर्षे पूर्ण केली आहेत. यानंतर माधुरी दोन मुलांची आई देखील झाली आहे.