मुंबई : कॉमेडियन भारती सिंह आजकाल सोशल मीडिया सेन्सेशन आहेत. गेल्या एका वर्षात, भारती सिंहने एक आश्चर्यकारक परिवर्तन केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॉमेडियनने फक्त एका वर्षात 15 किलो वजन कमी केलं आहे. होय, भारती सिंहचं वजन, पूर्वी  91 किलो होतं, आता तिचं वजन 76 किलोवर आलं आहे. भारती सिंह म्हणली की, 'मी स्वतः आश्चर्यचकित आहे की, मी माझे वजन इतकं कमी केलं आहे, आता मला दमा लागत नाही आणि मी हलकं फिल करते. माझा डायबिटीज आणि दमा देखील नियंत्रणात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारती सिंह सांगते की, तिच्या परिवर्तनामागचं रहस्य अधूनमधून फास्टिंग आहे. कॉमेडियन म्हणते की, ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत काहीही खात नाही. भारती हसून म्हणली, 'मी 12 वाजल्यानंतर अन्नावर हल्ला करते. माझं शरीर संध्याकाळी 7 वाजल्यानंतर अन्न स्वीकारत नाही. भारती सिंह असंही म्हणाली की, 'लॉकडाऊनमुळे आपल्याला अनेक गोष्टींच महत्व समजलं आहे, जसं की,  प्रेमळ कुटुंब आणि स्वतःवर प्रेम करणं'.


कॉमेडियन असंही म्हणाली, 'आप है तो परिवार है और काम है'. जर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं नाही तर कोणीही तुमच्यावर प्रेम करणार नाही. स्वतःवर प्रेम करणे आणि ते पडद्यावर पाहणं खूप छान वाटतं. माझ्या शरीरात परिवर्तन झालं आहे. आज जेव्हा मी स्वतःकडे पाहते, तेव्हा माझा चेहरा खूप स्लिम दिसतो आणि मी स्वतःला खूप स्लिम वाटते ... मला स्वतःचा अभिमान आहे '.