मुंबई : कॉमेडी क्विन भारती सिंग (Bharti Singh ) सध्याची आघाडीची विनोदवीर आहे. पण यासाठी भारतीने अनेक खस्ते खाल्ले आहेत. भारतीने करियरची सुरुवात 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' शोच्या माध्यमातून केली. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. भारतीने लल्ली भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. (bharti singh weight loss) चाहत्यांनी देखील भारतीला प्रचंड प्रेम दिलं आणि आजही देत आहेत. पण याआधी भारतीने अनेक वाईट प्रसंगांचा सामना केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता भारती अव्वल कॉमेडियन पैकी एक आहे. (bharti singh age) भारतीचं वर्तमान आणि भविष्य झगमगतं असलं तरी, भुतकाळात (bharti singh past) घडलेल्या गोष्टी कधी विसरता येत नाहीत. असंच काही भारतीसोबत देखील झालं आहे. भारतीने मनीष पॉलच्या (Manish Paul ) शोमध्ये तिच्या सोबत घडलेल्या वाईट गोष्टींचा खुलासा केला आहे. 


करियरच्या सुरुवातील कॉर्डिनेटर्स तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे. तेव्हा भारतीला आपल्यासोबत काय घडत आहे, हे कळायचं नाही. कारण सर्व कॉर्डिनेटर्स भारतीला काकांसारखे वाटायचे.  (bharti singh latest news)



यावर खुद्द भारती म्हणते, 'कॉर्डिनेटर्स माझ्या मागे हात लावायचे. मला असं वाटायचं काका आहेत, वाईट नसतील.' भारतीच्या वडिलांनी एका व्यक्तीकडून कर्ज घेतलं होतं. पण जेव्हा कर्जाची परतफेड करणं कठिण होतं तेव्हा त्या व्यक्तीने भारतीच्या आईसोबत गैरवर्तन केलं होतं. (bharti singh Mother) 


बालपणी भारतीची आर्थिक परिस्थिती बिकट होती. पण भारतीने स्वतःच्या बळावर यश मिळवलं आहे. (bharti singh net worth) आता भारतीकडे सर्व काही आहे.