मुंबई: आयुषमान खुराना याने अखेर त्याच्या पत्नीच्या आजारपणाविषयी एका मुलाखतीत आपलं मौन सोडलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची पत्नी ताहिरा कश्यप हिला कॅन्सर असल्याचं निदान झालं. हा आजार सध्याच्या घडीला अगदी प्राथमिक अवस्थेत असल्याचंही स्पष्ट झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पल्या पत्नीच्या याच आजारपणाविषयी आयुषमानने 'मिड डे'शी संवाद साधताना काही गोष्टी स्पष्ट केल्या. 


अडचणीच्या या प्रसंगाला मोठ्या धीराने आणि सकारात्मक दृष्टीने सामोरं जाण्याचंच आम्ही ठरवल्याचं त्याने स्पष्ट केलं. 


आपल्या वाढदिवसाच्याच दिवशी ताहिराला कॅन्सरचं निदान झालं ही बाबही त्याने यावेळी सर्वांसमोर आणली. 


'माझ्या वाढदिवसाच्या म्हणजे १४ सप्टेंबरच्याच दिवशी तिला कॅन्सर असल्याचं कळलं. त्यावेळी या गोष्टीविषयी मौन पाळणं किंवा त्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहणं हे दोनच उपाय आपल्याकडे होते', असं तो म्हणाला. 


ज्यावेळी ताहिराला या आजाराचं निदान झाल्याचं कळलं त्यानंतर ते दोघंही 'मनमर्जियाँ' हा चित्रपट पाहण्यासाठी गेले. ज्यानंतर त्यांनी ताहिराच्या शस्त्रक्रियेसाठीची तारीख वगैरे निश्चित केली. 


ताहिराच्या आजारपणाविषयी अगदी सुरुवातीला निदान झाल्यामुळे पुढची संकटं टळली, असंही त्याने स्पष्ट केलं. 


आयुषमान आणि ताहिरा या दोघांचाही अडचणीच्या प्रसंगाकडे पाहण्याचा एकंदर दृष्टीकोन खरंच प्रेरणादायी आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.



दरम्यान, खुद्द ताहिरानेच काही दिवसांपूर्वी एक सोशल मीडिया पोस्ट करत आपल्या या आजारपणाविषयी सर्वांना माहिती दिली होती. ज्यानंतर ती प्रत्येक प्रसंगात मोठ्या धीराने उभी राहिली असून, आयुषमानही तिला पावलोपावली साथ देत असल्याचं पाहायला मिळत आहे.