मुंबई :  अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) या जोडीकडे बॉलिवूडमधील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. दीपिका आणि रणवीरचा रिलेशनशिपपासून लग्नापर्यंतचा प्रवास तितका सोपा नव्हता. नात्यामध्ये आलेल्या आव्हानांचा सामना करत ही जोडी कायमच सर्वांना कपल गोल्स देत राहिली. मुख्य म्हणजे त्यांच्या वैवाहिक आयुष्यानंही चाहत्यांची मनं जिंकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलेसिशिपमध्ये असल्यापासून लग्नापर्यंतच्या या प्रवासात आपल्यासोबत असणारी व्यक्ती ही आपली जबाबदारी असते. तिच्याप्रतीही आपण महत्वपूर्ण भूमिका बजावत असतो. पण, अनेकदा जोडीदाराच्या आनंदासाठी प्रयत्न करत असतानाच इतर व्यक्तींप्रतीही आपण उत्तरदायी असतो याचा नकळतच विसरही पडतो. असंच काहीसं रणवीर सिंग याच्याशी घडलं. 


नेमकं काय घडलं? 
रिलेशनशिपमध्ये असताना रणवीर दीपिकाच्या मनातलं स्थान आणखी भक्कम करण्यासाठी म्हणून तिला कायम फुलं पाठवत असे. हे रणवीरच्या वडिलांच्या लक्षात आलं. त्यावेळी लेकाला टोकत त्यांनी इतके पैसे खर्च न करण्याचा सल्ला दिला होता. इतका खर्च का करतोस, असा प्रश्न विचारला असता, रणवीरनं काहीसं थक्क करणारं उत्तर दिलं होतं. 


दीपिकासाठी फुलं घेत त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करणाऱ्या रणवीरला वडिलांच्या प्रश्नाला सामोरं जावं लागलं. त्यावेळी उत्तर देत, लक्ष्मीच्या रुपात ही फुलं आपल्याकडे येतील ('लक्ष्मी के अवतार में छप्पर फाड़ के वापिस आएंगे') असं तो म्हणला होता. रणवीरनं दिलेलं हे उत्तर, खऱ्या अर्थानं सर्वांना पटणारं आहे असं म्हणणं वावगं नाही. लक्ष्मीच्या रुपानं आयुष्यात येणारी मुलगी आणि तिच्यासोबत येणारे संस्कार, राहणीमान हे सारंकाही या फुलांहूनही महत्त्वाचं आणि मौल्यवान अशीच यामागची भावना.