मुंबई : दिलखुलास स्वभाव, असामान्य आणि तितकंच हरहुन्नरी व्यक्तीमत्व आणि कल्ला करण्यात पुढे असणाऱ्या कलाकारांविषयी विचारलं तर अनेकांच्याच ओठांवर एकच नाव येतं. ते नाव म्हणजे अभिनेता रणवीर सिंग याचं.
'बँड बाजा बारात' या चित्रपटातून बिट्टू सिंग ही भूमिका साकारत रणवीरने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहता पाहता रणवीर या चित्रपटविश्वात असा काही स्थिरावला की अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांची त्याला प्रथम पसंती मिळू लागली. 


रणवीरच्या अभिनय कौशल्याची आणि त्याच्या जिद्दीची झलक पाहायला मिळाली ती म्हणजे 'राम-लीला', 'बाजीराव-मस्तानी' आणि ' पद्मावत' या चित्रपटांमधून. 


सर्वच बाबतीच उजवा ठरणारा हा अभिनेता कारकिर्दीत स्थिरावल्यानंतर आता विवाहबंधनात अडणार आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यासोबत तो १४ आणि १५ नोव्हेंबरला लग्नगाठ बांधणार आहे. 


दीपिकासोबत सहजीवनाची शपथ घेण्यापूर्वी बी- टाऊनच्या या अभिनेत्याने एक प्रियकर म्हणून त्याची वाईट सवय सर्वांसमोर सांगितली आहे. 


'कॉफी विथ करण' या लोकप्रिय चॅट शोच्या भागात रणवीरने अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत हजेरी लावली होती. खिलाडी कुमार आणि रणवीर या दोघांनीही करणच्या प्रश्नांची मोकळ्य मनाने उत्तरं दिली. 


गप्पांच्या ओघातच करणने त्यांना पती किंवा प्रियकर म्हणून तुम्हाला नेमक्या कोणत्या वाईट सवयी आहेत, अशा आशयाचा प्रश्न विचारला. 


करणच्या या प्रश्नाचं उत्तर देत खिलाडी कुमारने आपल्याला बेसावध असण्याची किंवा एखाद्या गोष्टीविषयी बेफिकीर असण्याची वाईट सवय असल्याचं सांगितलं. तर, रणवीरने आपल्याला कोणत्याही ठिकाणी उशिरा पोहोचण्याची वाईट सवय असल्याचं सांगितलं. 


त्याचं हे वक्तव्य पाहता वेळ आणि रणवीरची गट्टी कधी जमलीच नाही, असंच म्हणावं लागेल. मुख्य म्हणजे त्याच्या या सवयीचा दीपिकाला त्रासही झाला असेलच. 


कारण, दीपिका कोणत्याही ठिकाणी ठरलेल्या वेळेतच पोहोचते. ती वेळेच्या बाबतीत अतिशय वक्तशीर आहे. त्यामुळे आता रणवीरची ही वाईट सवय दीपिका बदलणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.