मुंबई : वैवाहिक जीवनात आलेल्या वादळामुळे काही वर्षे या नात्यातून विभक्त होण्याचा निर्णय घेणाऱ्या कोंकणा सेनशर्मा आणि रणवीर शौरी या सेलिब्रिटी जोडीने अखेर त्यांचं नातं याच वळणावर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वर्षे विभक्त राहिल्यानंतर या दोघांनीही अखेर घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. 'स्पॉटबॉयई'च्या माहितीनुसार पुढील सहा महिन्यांमध्ये त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटस्फोटानंतरही त्यांच्या नात्यात असणारा मैत्रीचा दुवा कायम असणार आहे. ज्यामध्ये ते दोघंही हरुन या त्यांच्या आठ वर्षांच्या मुलाची जबाबदारी एकत्र मिळून घेणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार हा घटस्फोट एका वेगळ्या आणि तितक्याच शांततापूर्ण वातावरणात झाला आहे. पण, तरीही ते इतक्या वर्षांनंतरही या नात्याला पूर्वपदावर आणू शकले नाहीत ही मात्र दु:खदायक बाब आहे.


२०१०मध्ये रणवीर आणि कोंकणा विवाहबद्ध झाले होते. ज्यानंतर २०१५मध्ये कोंकणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ते दोघंही विभक्त होणार असल्याचं सांगितलं. 'रणवीर आणि मी, आम्ही दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. पण, आमच्यातील मैत्री कायम असेल आणि मुलाची काळजी आम्ही दोघं मिळून घेऊ', असं ट्विट तिने त्यावेळी केलं होतं. 



पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत


 



'ट्रॅफिक सिग्नल', 'मिक्स्ड डबल्स', 'आजा नचले' अशा चित्रपटांमधून रणवीर आणि कोंकणाची जोडी झळकली होती. काहीही कल्पना नसताना त्यांच्या नात्यात निर्माण झालेली ही तेढ अनेक प्रश्न उपस्थित करणारी होती. ज्यासाठी त्यांनी समुपदेशनाचीही वाट निवडली होती. पण, त्याचाही फारसा फायदा मात्र होऊ शकला नव्हता. पण, त्याचाही पुरेसा फायदा झाला नाही. अखेर ही जोडी आता या नात्याला इथेच पूर्णविराम देत आहे.