मुंबई : अभिनेता salman khan सलमान खान आणि त्याच्या कुटुंबालाही गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या Coronavirus कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा फटका बसला आहे. देशभरात लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी सलमान आणि त्याचे काही कुटुंबीय मुंबईपासून दूर गेले होते. काही खास क्षण व्यतीत करणअयासाठी म्हणून मुळ घरापासून दूर असणआरी ही मंडळी सध्याच्या घडीला तेथेच अडकली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथे अडकली आहेत म्हणण्याचं कारण म्हणजे कोरोना व्हायरसमुळे एकंदरच वातावरणात आलेली चिंता आणि त्यात सातत्याने होणारी वाढ पाहता आता सलमाननेही याची धास्ती घेतली आहे. आपल्याला या क्षणाची फार भीती वाटत असल्याचं खुद्द बॉलिवूडॉच्या या दबंग खानने सांगितलं आहे. 


जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचं भारतावरही सावट आहे. ज्या धर्तीवर प्रशासनाकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. लॉकडाऊन हा त्यापैकीच एक निर्णय. ज्यामुळे गेल्या जवळपास तीन आठवड्यांपासून अभिनेता सलमान खान हा त्याच्या वयोवृद्ध आई-वडिलांना भेटू शकलेला नाही. इतकंच नव्हे, तर त्याचा पुतण्या निर्वान म्हणजेच अभिनेता सोहेल खान याचा मुलगाही त्याच्या कुटुंबापासून गेल्या तीन आठवड्यांपासून दूर आहे. 


 

 

 

 



A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on


सलमानने आपल्या कुटुंबाची ही व्यथा एका व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावरुन सर्वांपुढे मांडली आहे. 'यावेळी सद्यस्थितीला मी धाडसाने सांगयतोय .की हो मी घाबरलो आहे', असं तो वारंवार म्हणताना दिसत आहे. 'जो डर गया समजो मर गया', या ओळीचा इथे उपयोग नसल्याचं सांगत त्याने एक भीतीदायक वास्तव सर्वांपुढे ठेवलं. त्याचा हा व्हिडिओ पाहता तरी किमान घराबाहेर करण्यापूर्वी परिस्थितीतीचा विचार करा हे एकच सांगणं. 
#घरीराहा_सुरक्षितराहा