मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या चित्रपटांची चांगलीच चर्चा बी टाऊनमध्ये पाहायला मिळते. मुळात या दोन्ही कलाकारांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला चाहत्यांची पसंती मिळते. फक्त रुपेरी पडद्यावरच नव्हे, तर पडद्यामागंही हे दोन्ही सेलिब्रिटी एकमेकांचे चांगले मित्र आहेत. पण, तुम्हाला माहितीये का एकदा कतरिनानं खिलाडी कुमारकडे असं काही मागितलं होतं, जे ऐकून त्याला काय कराव हेच सुचेना.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्येच कतरिनानं यासंदर्भातील खुलासा केला होता. कतरिना अक्षय कुमारचा फार आदर करते, त्याला आपला खरा मित्र आणि हितचिंतकही मानते. याच नात्याची घट्ट वीण पाहता, एकदा मी तुला राखी बांधू शकते का, असा प्रश्न तिनं अक्षय कुमारला केला होता.


कतरिनाच्या या अनपेक्षित प्रश्नानंतर त्याचा चेहरा पाहण्याजोगा होता. ‘तुला कानशिलात हवीये का?’ असाच प्रतिप्रश्न त्यानं तिला केला होता. यानंतर कतरिनानं हाच प्रश्न अभिनेता अर्जुन कपूरला विचारला होता. पण, अर्जुनही तिच्या कचाट्यात सापडला नाही. सेलिब्रिटींमध्ये असणारी ही नाती आणि त्यातूनच घडणारे हे सर्व किस्से चाहत्यांसाठी कायमच कुतूहलाचा विषय ठरतात.


दरम्यान, कतरिनानं आतापर्यंत अक्षय कुमारसह ‘हमको दिवाना कर गए’, ‘नमस्ते लंडन’, ‘ब्ल्यू’, ‘दे दना दन’, ‘तीस मार खान’ या चित्रपटांच्या निमित्तानं स्क्रीन शेअर केली आहे. लवकरच ही जोडी ‘सूर्यवंशी’मधूनही झळकणार आहे.