मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ हिनं हिंदी  चित्रपट विश्वामध्ये फार कमी काळात तिचं वेगळं स्थान निर्माण केलं. कतरिनानं रुपेरी पडदा गाजवत जितकं नाव कमवलं, तितकंच तिचं खासगी आयुष्यही चर्चेचा विषय ठरलं. खासगी आयुष्याबाबत सुरुवातीला अतिशय कमी वक्तव्य करणारी कतरिना हल्ली मात्र या साऱ्या मुद्द्यांवर खुलेपणानं बोलू लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या विकी कौशलसोबत तिच्या लग्नाच्या चर्चा सुरु असल्या तरीही एक काळ असा होता, जिथं तिला बराच खडतर टप्पा पाहावा लागला होता. असं असलं तरीही या काळात ज्य़ा व्यक्तींशी बिनसलं त्यांच्याशीही तिनं चांगलंच नातं जपलं आहे. 


भूतकाळाबाबत नुकतंच तिनं केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्या नजरा वळवल्या. 'भूतकाळात घडलेल्या गोष्टी भूतकाळातच राहतात. मला त्या व्यक्ती कळतात, आणि हेच तर एका मैत्रीच्या नात्याची परिभाषा मांडतं. मी काही त्या व्यक्तींबाबत राग वगैरे बाळगत नाही. मी तसं करणारही नाही, कारण या साऱ्यासाठी माझ्या मनात स्थानच नाही'. 


ज्या व्यक्तींशी भूतकाळात काही कारणानं बिनसलं अशा व्यक्तींशी आताचं नातं पूर्वीइतकं घट्ट नसलं तरीही ते तितकं वाईटही नाही हे कतरिनानं स्पष्ट केलं. 


कतरिनाचं नाव अनेक कलाकारांशी जोडलं गेलं होतं. सलमानशीही तिचं अफेअर असल्याचं सांगितलं गेलं. रणबीर कपूरशी कतरिनाची जवळीक वाढली, किंबहुना तिची त्याच्या कुटुंबातही ये-जा होती. पण, गणित चुकलं आणि पाहता पाहता नाती बदलली. 


रणबीर आणि कतरिनाच्या वाटा वेगळ्या झाल्या. ज्यानंतर काही वर्षांनी आता कतरिना आणि विकी कौशल ही जोडी त्यांच्या नात्याला पुढे नेणार असून, त्यांच्या बहुचर्चित रिलेशनशिपला लग्नाचं नाव देण्यासाठी सज्ज झाल्याचं म्हटलं जात आहे.