Kartik Aaryan Big Decision: बॉलीवूड स्टार (Bollywood) कार्तिक आर्यनचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय. याला कारणही तसंच आहे . बॉलीवूडचे काही मोठे स्टार सध्या पान मसालाची (Pan Masala) जाहीरात करताना दिसतायत. यात शाहरुख खान (Shahrukh Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अजय देवगण (Ajay Devgan) सारख्या दिग्गज अभिनेत्यांचाही समावेश आहे. या जाहीरातींच्या माध्यमातून हे अभिनेते करोडो रुपयांची कमाई करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण पान मसालाची जाहीरात करण्यावरुन या अभिनेत्यांवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाहरुख खान आणि अजय देवगणनंतर  अक्षयकुमार पान मसालाच्या जाहिरातीत झळकल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे.


एकीकडे हे दिग्गज अभिनेते करोडो रुपयांसाठी पान मसाल्याची जाहीरात करत असताना दुसरीकडे एका नव्या अभिनेत्याने करोडो रुपयांची ऑफर नाकारली आहे. अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) पान मसाल्याच्या जाहीरातीसाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. पण कार्तिक आर्यनने स्पष्ट शब्दात ती ऑफर धुडकावून लावली आहे. 


कोट्यवधी रुपयांची ऑफर धुडकावली
कार्तिक आर्यनला पान मसालाच्या जाहीरातीसाठी विचारणा करण्यात आली. या जाहीरातीसाठी त्याला तब्बल 8 ते 9 करोड रुपयांची ऑफर देण्यात आली होती. पण लोकांच्या तब्येतीसाठी हानीकारण ठरणाऱ्या जाहीराती करण्यास कार्तिक आर्यनने नकार दिला. कार्तिक आर्यनच्या या निर्णयाचं चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. दरम्यान, कार्तिक आर्यनचं याबाबतीत अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.


कार्तिक आर्यनच्या या निर्णयामुळे त्याने  पैशाऐवजी त्याच्या तत्त्वांना महत्त्व दिल्याचे स्पष्ट झालं आहे.  कार्तिक आर्यनचा हा निर्णय अनेक बॉलिवूड स्टार्ससाठी एक उदाहरण आहे. 


पान मसाल्याची जाहीरात केल्याने अभिनेता अक्षय कुमारला चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर अक्षय कुमारने समोर येऊन लोकांची माफी मागितली, तसंच भविष्यात अशा जाहीराती करणार नाही असं वचनही दिलं.