मुंबई : सिनेसृष्टीत एक स्टार होण्यासाठी अनेक सेलिब्रेटींना अनेक तडजोडी कराव्या लागतात. ज्यांना आज आपण चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे पाहतो. खऱ्या आयुष्यात एक सत्य धक-धक गर्ल माधुरी दीक्षितच्या नावावर कोरलं गेलं आहे. चला तिच्याशी संबंधित मनोरंजक किस्से जाणून घेऊया. तेजाब' आणि 'दिल' सारख्या चित्रपटांनी माधुरीला प्रेक्षक आणि बॉक्स ऑफिसने पहिला क्रमांक दिला. याच दरम्यान 'साजन' सिनेमाचं काम सुरू झालं, ज्याने या लव्हस्टोरीचं पहिल पान गिरवलं  या चित्रपटात संजय आणि माधुरी व्यतिरिक्त सलमान खानसुद्धा आहे. मुख्य भूमिकेत असलेले माधुरी दीक्षित आणि संजय दत्त हे खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेटवर दोघेही गुपचुप  एकमेकांसोबत वेळ घालवायचे, तर दुसरीकडे संजय दत्तचं लग्न झालं होतं. माधुरी आणि संजय हे अफेअर संजयच्या फॅमिलीसाठी त्रासदायक बनू लागलं होती, त्यावेळी संजयला एक मुलगी होती या सगळ्या गोष्टींची पर्वा न करता दोघांनीही 'खलनायक' चित्रपटात साइन केला.


खलनायक चित्रपटामुळे आले जवळ
'खलनायक' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील प्रेम आणखी खास बनू लागलं, पण या दरम्यान, अशी बातमी समोर आली की, माधुरीच्या कुटूंबाला संजय दत्त आणि त्यांच्या नात्याबद्दल आक्षेप आहेत, तर संजयच्या पत्नीलाही या नात्याबद्दल समजलं होतं. .... त्याची पत्नी भारत सोडून गेली होती. ती आपल्या मुलीसह अमेरिकेत शिफ्ट झाली. यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर  प्रेमसंबंधामुळे माधुरी गर्भवती होण्याची भीती अनेक दिग्दर्शकांना होती


सिनेमाच्या त्या सीनसाठी आयुष्यभर माधुरीला खंत
ही गोष्ट आहे त्यावेळची जेव्बा विनोद खन्ना त्याच्या अभिनय क्षेत्रात दुसऱ्या फेजमध्ये होते. यावेळी विनोद खन्ना यांनी एक रोमँटिक भूमिका करण्याचा विचार केला होता. त्याचवेळी फिरोज खान दयावान हा चित्रपट बनवत होते.



विनोद परत आल्यावर फिरोज खानने त्याला दयावानच्या मुख्य भूमिकेची ऑफर दिली आणि फिरोज खानने अभिनेत्रीसाठी माधुरीकडे संपर्क साधला. त्यावेळी माधुरी दीक्षितचं वय 21होतं , तर विनोद खन्ना 42 वर्षांचे होते. इंडस्ट्रीत धडपडत असलेल्या माधुरीने त्यावेळी चित्रपटासाठी हो सांगितलं खरं पण, नायक वयापेक्षा खूप मोठा आहे याबद्दल तिला वाईट वाटत होतं. मात्र, चित्रपटाचे शूटिंग सुरू झालं. माधुरीला काय माहित होतं की या चित्रपटात तिच्यासोबत काहीतरी असं घडेल जे तिला आयुष्यभर विसरता येणार नाही.


माधुरी आणि विनोद यांचे काही इंटीमेट आणि लिपलॉक सीन
या सिनेमात माधुरी आणि विनोद यांचे काही इंटीमेट आणि लिपलॉक सीन होते. प्रत्येकालाच असं वाटत होतं की, कदाचित माधुरी हे सीन करणार नाही. मात्र माधुरीने सर्वांना चुकीचं सिद्ध केलं आणि विनोदसोबतचे हे सीन माधुरीने अगदी सहज दिले. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा लोक या इंटीमेट सीनबद्दल सर्वाधिक बोलले. त्यावेळेस असे सीन चित्रित करणं म्हणजे त्यावेळीची मोठी गोष्ट होती. एका मुलाखतीत माधुरी म्हणाली की, तिला बर्‍याच काळासाठी या सीनबद्दल खेद देखील वाटत होता.