मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवी हिच्या जाण्याने फक्त कपूर कुटुंबच नाही तर संपूर्ण बॉलिवूड त्या धक्कयात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

24 फेब्रुवारी रोजी श्रीदेवीचा मृत्यू झाला. फॉरेन्सिक रिपोर्टनुार त्यांचा मृत्यू बाथटपमध्ये बुडून झाला. मात्र काही लोकांना अजूनही ही गोष्ट कशी घडली हे कळत नाही. यावर पहिल्यांदा श्रीदेवीचा नवरा बोनी कपूरने सिनेमा समीक्षक कोमल नाहटा यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. कोमल नाहटा यांनी याबाबत ब्लॉग लिहिला आहे. 


कोमल नाहटा यांचा ब्लॉग 



कोमला नाहटा यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, बोनी कपूर यांनी सांगितलं की 2018 मध्ये दुबई ट्रिप हे अगदी 1994 च्या बंगलुरू ट्रिपप्रमाणे अगदी अनशेड्यूल होतं. त्यांनी सांगितलं की, श्रीदेवी आपली मुलगी जान्हवीसाठी शॉपिंग करायला दुबईत थांबली होती आणि परत मुंबईत आलो होतो. नाहटा यांनी लिहिलं होतं बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी 24 फेब्रुवारी रोजी फोनवर चर्चा केली होती. तेव्हा श्रीदेवीने त्यांना सांगितलं होतं की, ती मला खूप मिस करत आहे. तेव्हा बोनी कपूर यांनी देखील आपण तुला मिस करत असल्याचं सांगितलं मात्र आपण तिला सरप्राईज द्यायला दुबईत आलो आहोत हे मात्र सांगितलं नाही. 


काय म्हणाले बोनी कपूर?


कोमल यांनी सांगितलं की, श्रीदेवी ज्या हॉटेलमध्ये थांबली होती त्या रूमची ड्युबलिकेट चावी बोनी कपूर यांच्याकडे होती. तसेच स्टाफला सांगितलं की, माझं सामान नंतर तुम्ही घेऊन या. त्या चावीने दरवाजा उघडून श्रीदेवीला सरप्राईज दिलं. त्यानंतर दोघांनी जवळपास अर्धातास गप्पा मारल्या. त्यांनतर बोनी कपूर यांनी आपण डिनरला जाऊ असं सांगितलं. 


त्यानंतर श्रीदेवी आंघोळीसाठी गेल्या आणि बोनी कपूर त्यांची वाट पाहत बाहेर टीव्ही बघत होते. मात्र बराच वेळी श्रीदेवी न आल्यामुळे त्यांनी तिला आवाज दिला. मात्र कोणतंच उत्तर न आल्यामुळे त्यांनी दार उघडलं. तर श्रीदेवी बाथटबमध्ये बुडाल्या होत्या.