मुंबई : चिरंजीवी स्टारर 'से रा नरसिंहा रेड्डी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १ अठवडा पूर्ण केला आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा सतत चढत्या क्रमांकावर आहे. 'मारना मरना महत्व नही, महत्व हैं जितना' 'से रा नरसिंहा रेड्डी' चित्रपटात ब्रिटीश सरकारकडून भारतीयांवर होत असलेले अन्याय दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. २ ऑक्टोबरला रूपेरी पडद्यावर दाखल झालेल्या चित्रपटाने चांगलीच मजल मारली आहे.    



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन कोटींच्या बजेटमध्ये साकारण्यात आलेल्या चित्रपटाने ६ दिवसांत १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. 


चित्रपटाची कथा योद्धा उय्यालावादा से रा नरसिंहा रेड्डी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन नरसिंहा रेड्डी यांच्या गुरूंच्या भूमिकेत झळकत आहेत.