Chiranjeevi talked about Cancer News : दाक्षिणात्य मेगा स्टार चिरंजीवी हे नेहमीच त्यांच्या चित्रपटामुळे चर्चेत असतात. चिरंजीवी हे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि पोस्ट शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारे चिरंजीवी सध्या चर्चेत असण्याचं कारण हे त्यांची एक सोशल मीडिया पोस्ट आहे. चिरंजीवी यांना कॅन्सरचं निदान झाल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करत असल्याचे म्हणत अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या. आता चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना याविषयी माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिरंजीवी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये चिरंजीवी म्हणाले, “काही दिवसांपूर्वी कॅन्सर सेंटरचे उद्घाटन करताना मी सांगितले होते की, कॅन्सरबद्दल जनजागृती करणे खूप आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्ही नियमित वैद्यकीय चाचण्या केल्या तर तुम्ही कर्करोग टाळू शकता आणि त्यामुळेच मी कोलन स्कोप चाचणी केली. या चाचणीत नॉन-कॅन्सरस पॉलीप्सचं निदान झालं आणि नंतर ते काढण्यात आले. मी इतकंच म्हणालो होतो की जर चाचणी केली नसती तर कॅन्सर झाला असता. यासाठीच प्रत्येकानं सावध राहून चाचणी करून घेतली पाहिजे. मी फक्त इतकंच म्हणालो होतो.”



पुढे मीडिया माध्यमांवर संताप व्यक्त करत चिरंजीवी म्हणाले, “पण काही माध्यमांना ते नीट कळलं नाही आणि ‘मला कॅन्सर झाला’ आणि ‘उपचार केल्यामुळे मी वाचलो’ अशा बातम्या त्यांनी चालवल्या. पत्रकारांनी अशा खोट्या बातम्या देऊ नयेत असे मी आवाहन करतो. विषय समजून घेतल्याशिवाय मूर्खपणाने लिहू नका. यामुळे अनेक लोक घाबरले आणि त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.” चिरंजीवी यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 


हेही वाचा : ऋतुराज गायकवाडचा लग्नातील फोटो शेअर करत Sayali Sanjeev म्हणाली...


दरम्यान, चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करत चाहत्यांना चिंतेतून मुक्त केलं आहे. चिरंजीवी यांची पोस्ट पाहता नेटकऱ्यांनी कमेटं करत देवाचे आभार मानले आहे. त्यासोबत त्यांच्या चाहत्यांनी कमेंट करत चिरंजीवी यांचे देखील आभार मानले की त्यांनी सगळ्यांना सत्य सांगितलं. चिरंजीवी यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ते लवकरच 'भोला शंकर' या चित्रपटात दिसणार आहेत.