मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरच्या लग्नाच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला होता. परंतु या चर्चांमध्ये किती तथ्य आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तर अभिनेत्री दीपिका पदुकोनने आलिया-रणबीरच्या लग्नाचा खुलासा केला आहे. दीपिकाच्या एका चूकीमुळे त्यांच्या लग्नाचे सत्य उघड झाले आहे. कलाकार नेहमी त्यांचे लग्नाचे विषय गुपीत ठेवतात. परंतु एका कार्यक्रमात दीपिकाने आलिया-रणबीरच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच, दीपिका पादुकोन, आलिया भट्ट, रणवीर सिंग, आयुषमान खुराणा, मनोज वाजपेयी त्याचप्रमाणे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतले कलाकार विजय देवरकोंडा, पर्वती तिरुवोतो, विजय सेतुपती हे ‘फिल्म कम्पॅनियन’च्या मुलाखतीत एकत्र जमले होते. 


'इंडियन चित्रपटात असे कोणते कलाकार आहेत, ज्यांच्याकडून तुम्हाला सल्ला घ्यायला आवडेल?' असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर विजय देवरकोंडा गंमतीदार उत्तर दिले आणि या उत्तरातून आलिया-रणबीरच्या लग्नाचे वास्तव समोर आले. 


'मी तर दीपिका आणि आलिया सोबत प्रेम करतो, पण दीपिकाचं लग्न झालं आहे.' त्याच्या अशा वक्तव्यावर दीपिका म्हणाली 'आलिया पण लवकरच लग्न करणार आहे.' पण दीपिकाला लगेचच तिच्या चूकीची जाणीव झाली आणि तिने परिस्थिती सांभाळली. 


आलिया-रणबीर ही जोडी चर्चेत असल्यामुळे अनेक कलाकार या दोघांना एकत्र पडद्यावर दाखवू इच्छितात. आलिया-रणबीर यांनी 'ब्रम्हास्त्र'च्या रिलीजपर्यंत कोणताही सिनेमा न स्विकारण्याचं ठरवलं. अयान मुखर्जीच्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटातून समोर येणाऱ्या या जोडीला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.