मुंबई: ड्रग्स प्रकरणी आर्यन खानचे पाय आणखी खोलात जात असल्याचं दिसत आहे. शाहरूख खान आणि गौरीला दिलासा मिळाला नाही. आर्यन खानला ड्रग्स प्रकरणी 26 ऑक्टोबरला सुनावणी होणार होती. आर्यन 26 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये होता. मात्र ही कोठडी आणखी 4 दिवस वाढवण्यात आली आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत आर्यन न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे आता आर्यनला त्यानंतर तरी दिलासा मिळणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे आज अनन्या पांडेच्या घरी NCB च्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. आर्यन खान प्रकरणात अनन्याचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे. आता आर्यन खानच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पाहायला मिळत आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत त्याला कोठडीत राहावं लागणार आहे. तर दिवळीआधी जामीन मिळणार का? की आर्यनची दिवळीही कोठडीत जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 



आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवी माहिती पुढे आली आहे. अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या वांद्रे येथील घरावर NCBने छापा मारला आहे. अनन्या हिच्या पाली हिल येथील निवासस्थानी शोधमोहीम राबवली गेली. यावेळी काही वस्तू NCBच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. 


आर्यन खानवरील आरोपांबद्दल बोलताना, NCB ने त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंगशी संबंधित असल्याचा खटला दाखल केला आहे.आर्यन खानची जामीन याचिका दंडाधिकारी आणि सत्र न्यायालयाने फेटाळली आहे.


आता त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावर मंगळवारी, 26 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, त्याला कारागृहातच राहावे लागेल.