Falguni Pathak: कलाकरांचे लग्न हा चाहत्यांसाठी खूप चर्चेला विषय असतो. त्यातच जर कलाकार त्यांचे आवडीचे असतील तर विषयच संपला. भारतातील लोकप्रिय गायिका फाल्गुनि पाठक यांच्याबद्दलही चाहत्यांच्या मनात उत्सुकता असते. फाल्गुनी पाठक यांनी लग्न का केलं नाही? याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जातात. खुद्द फाल्गुनी पाठक यांनीच आता याबाबत खुलासा केला आहे. दांडिया क्वीन या नावाने ओळखल्या जाणार्या फाल्गुनी पाठक यांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फाल्गुनी पाठक या मुख्यकरुन गुजराती गाणी जास्त करुन गातात. तसंच, त्यांची हिंदी गाणीदेखील खूप लोकप्रिय आहेत. याद पिया की आने लगी ते चुडी जो खनके हाथो मे यासारख्या गाण्यांमुळं त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. इतकंच नव्हे तर फाल्गुनी पाठक या त्यांच्या लुक्समुळंही नेहमी चर्चेत असतात. फाल्गुनी यांचे वय 55 आहे. तरीदेखील त्यांनी अजून लग्न का केलं नाही. याचे उत्तर त्यांनी दिलं आहे. 


फाल्गुनी यांनी अलीकडेच एका चॅट शोमध्ये त्यांच्या पर्सनल लाइफबद्दल बोलल्या आहेत. करिश्मा तन्नाच्या चॅट शोमध्ये त्यांना लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर त्यांनी न डगमगता स्पष्ट उत्तर दिलं आहे. करिश्माने त्यांना विचारलं होतं की, तुमच्या वैयक्तीक आयुष्यात तुम्हाला कोणाबद्दल अटॅचमॅट नाही का? त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, संगीत माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे. संगीत ही एकमेव गोष्ट आहे जिच्याशी मी सर्वात जास्त अटॅच आहे. म्युझिकशिवाय मला कशाचीही माहिती नाही. लहानपणापासून ते माझ्यासोबत आहे आणि मी आयुष्यभर त्याच्याशी जोडलेली राहीन.


करिश्माने जेव्हा त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी म्हटलं की, मला वैयक्तिक आयुष्याची पर्वा नाही. कारण माझे आई-वडील माझी काळजी घेण्यासाठी आहेत. नाहीतर मी स्वतः माझी काळजी घेऊ शकते. फाल्गुनी पुढे म्हणतात की, मला संगीताची एवढी आवड होती की, मला इतर कशाचाही विचार करण्याची संधी मिळाली नाही. हेच कारण आहे की मी आजपर्यंत अविवाहित आहे. त्याचवेळी फाल्गुनी पाठकने तिच्या टॉम बॉय लूकबद्दलही सांगितले. तो म्हणाला, चार मुलींनंतर मुलगा होईल, अशी आशा पालकांना होती. पण ते होऊ शकले नाही म्हणून मी लहानपणापासूनच मुलांसारखी राहू लागली.