खतरनाक पाऊस आणि थरारक निसर्ग! पावसाळ्यात महाराष्ट्रातील 'या' गावात जायला डेरिंग लागते

Maharashtra Rain: महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस याच गावात पडतो. हे गाव कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन आहे.   

| Sep 16, 2024, 19:45 PM IST

Amboli rain : महाराष्ट्रातील मान्सून सध्या शेवटच्या टप्प्यात आलाय असं म्हणायला हरकत नाही. पावसाळ्यात महाराष्ट्रचं वेगळचं रुप पहायला मिळत.  हिरव्यागार डोंगरातून कोसळणारे धो धो धबब्यांचे आक्राळ विक्राळ रुप पाहून धडकी भरते. गर्द झाडी गुंगारा देते. असा सगळा अनुभव महाष्ट्रातील एका गावात. या गावात सर्वात जास्त पाऊस पडतो. म्हणूनच  पावसाळ्यात 'या' गावात जायला डेरिंग लागते. 

 

1/7

डोंगर दऱ्यांनी संपन्न असलेल्या महाराष्ट्राचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलून दिसते. पावसाळ्यात कोकणातील या गावाला भेट देणे म्हणजे स्वर्ग सुखचं.

2/7

उंचावरून कोसळणारे पांढराशुभ्र धबधबे, धुकं आणि पावसामुळे इथलं वातावरण आलाहदायक बनते. यामुळे अनेक पर्यटक पावसाळ्यात येथे जाण्याचा बेत आखतात.   

3/7

आंबोली घाटातील सनसेट पॉइंट आणि महादेव पॉइंटवरून ढगांची गर्दी पहायला मिळतो.   

4/7

नभ उतरू आलं....याची प्रचिती पावसाळ्यात आंबोली घाटात पहायला मिळतेय. फेसाळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. 

5/7

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीपासून 30 किमी अंतरावर आंबोली आहे. आंबोली घाट हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.  

6/7

आंबोली हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.  हे थंड हवेचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. 

7/7

महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावात पडतो.  म्हणूनच आंबोली हे महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते.