मुंबई : लग्न मोडल्यानंतर अनेकदा स्त्रिया तुटतात, पण काही असे असतात जे स्वत:ला या सगळ्यातून बाहेर काढतात आणि स्वतंत्र्य आयुष्य जगू लागतात. आज आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत. ज्यांचं आयुष्य घटस्फोटानंतरही विस्कळीत झालं नाही. पण परिवर्तन मात्र झालं आहे आणि त्या आपल्या मुलांची चांगली काळजी घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'लॉक अप' स्टार निशा रावलने गेल्या वर्षा तिचा पती करण मेहरावर कौटुंबिक हिंसाचे आरोप केले. पतिपसून वेगळं झाल्यनंतर निशा रावलने आपला मुलगा काविशची सांगोपाची जबाबदारी घेतली.



या यादीत नागिन 6 स्टार उर्वशी ढोलकियाच्या नावाचाही समावेश आहे. उर्वशी ढोलकियाचं लग्न फार कमी काळ टिकलं. मात्र, याच काळात उर्वशी ढोलकिया 2 मुलांची आई झाली. आज उर्वशी ढोलकिया सिंगल मदर असून आपल्या दोन्ही मुलांचं संगोपन करत आहे.



श्वेता तिवारी दोन मुलांची आई आहे. श्वेता तिवारी या दोन्ही मुलांचं संगोपन स्वबळावर करत आहे. श्वेता तिवारीचं लग्न राजा चौधरी आणि अभिनव कोहलीसोबत झालं होतं. श्वेता तिवारीची दोन लग्ने काही वेळातच तुटली. वैवाहिक नातं संपुष्टात आल्यानंतर श्वेता तिवारीचं लक्ष आता फक्त तिच्या मुलांवर आहे.



दिलजीत कौर आणि शालीन भानोत हे देखील अनेक वर्षांआधी वेगळे झाले आहेत. घटस्फोटानंतर दलजीत कौर टीव्ही दुनियेत परतली. दलजीत कौर आपल्या मुलांना वाढवण्यासाठी सतत काम करत आहे.



चाहत खन्नाने फरहान मिर्झाशी लग्न केलं. लग्नाच्या काही वर्षांनी चाहत खन्नाचा घटस्फोट झाला. चाहत खन्ना यांनी पतीवर कौटुंबिक हिंसाचा आरोप केला होता. चाहत खन्नाला फरहान मिर्झासोबत 2 मुलं आहेत. चाहत खन्ना आपल्या दोन्ही मुलींना सिंगलप्रमाणे वाढवत आहे.