मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन लवकरच अक्षय कुमारसोबत बच्चन पांडे या चित्रपटात दिसणार आहे. त्याआधी क्रिती सतत चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. अलीकडेच एका मुलाखतीमध्ये बोलताना क्रितीने खुलासा केला आहे की, आधी बहुतेक अभिनेत्यांना तिच्यासोबत काम करायचं नव्हतं, पण आता तसं नाही. यामागचं कारणही क्रितीने सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्रीने सांगितलं की, बरेच कमी लोकं आहेत. जे दुसऱ्यांना समान रूपी स्क्रीन स्पेस करायला देतात. आणि म्हणून त्यांना क्रितीसोबत असा चित्रपट करायचा नव्हता ज्यामध्ये तिची भूमिका जास्त आहे. मी तेव्हा अशा परिस्थितीत होते जेव्हा बहुतेक हिरो चित्रपट करण्यास तयार नसतात जिथे 60% मी आणि 40% हिरो होते. अशा चित्रपटात काम करायला कोणी तयार नव्हतं. या गोष्टी थोड्या बदलल्या पाहिजेत असं मला वाटतं. अक्षयने 'अतरंगी रे'मध्ये जे केलं ते कौतुकास्पद होतं. त्याची छोटीशी पण चांगली भूमिका होती. अक्षय कोणाशीही इतका असुरक्षित नसून तो आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावतो.


तिच्या चित्रपट निवडीबद्दल आणि भूमिकांबद्दल, अभिनेत्री म्हणाली, "'बरेली की बर्फी' केल्यानंतर, माझ्याकडे समान शैलीचे 99% लहान शहरांच्या शैलीचे चित्रपट आले होते, आणि आता लोकं मला विचारत असलेल्या ठिकाणी पोहोचून मला आनंद झाला आहे. 'तुला कोणत्या प्रकारचा चित्रपट करायचा आहे?' मला काय करायचे आहे, मला कुठे जायचं आहे किंवा मला ग्रे कॅरेक्टर करायला आवडेल की नाही हे मला आता लोकांना सांगता येत आहे. हा बदल पाहून खरोखरच आनंद होतो. कधी कधी हे इतक्या हळूवारपणे घडतं की तुम्हाला कळतही नाही