Pulkit Samrat getting Married : बॉलिवूड चित्रपटसृष्टीत लग्न सराईचा काळ सुरु झाल्याचे बोलता येईल. एकामागे एक सेलिब्रिटी हे लग्न बंधनात अडकल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षाच्या सुरुवातीला आमिरची लेक आयरानं बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधली. आता अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही जॅकी भगनानीसोबत सप्तपदी घेणार आहे. या सगळ्यात आता चर्चा सुरु झाली आहे की सलमान खानच्या मानलेल्या बहिणीच्या पूर्वाश्रमीचा पती म्हणजेच EX नवरा आणि अभिनेता पुलकित सम्राट बोहल्यावर बसणार आहे. पुलकित हा अभिनेत्री क्रिती खरबंदासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. चाहत्यांचं म्हणणं आहे की व्हॅलेंटाईन्स डेला क्रितीनं या आनंदाच्या बातमीची एक हिंट दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर पुलकित आणि क्रितीनं व्हॅलेंटाईन्स डेच्या निमिततानं त्यांचे फोटो शेअर करत एकमेकांवर असलेलं प्रेम जाहिर केलं आहे. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत त्याच्या मनात असलेल्या भावना जाहिर केल्या आहेत, तर दुसरीकडे क्रितीनं तिच्या पोस्टमध्ये मार्च असं म्हटलं आहे. क्रितीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर करत कॅप्शन दिलं की 'चल हातात हात घेऊन, एकत्र मार्च करुया.' मग काय, चाहत्यांनी या पोस्टचा दुसरा अर्थ घेत म्हटलं आहे की क्रिती आणि पुलकित पुढच्या महिन्यात लग्न बंधनात अडकणार असतील त्यामुळे तिनं ही हिंट देण्यासाठी मार्च असं म्हटलं आहे. 



या पोस्टवर रिअॅक्ट करत चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, मार्च टूगेदर, तुम्ही मार्चमध्ये लग्न करताय. दुसरा नेटकरी म्हणाला, 'ओएमजी!!! तुम्ही मला खूप आवडता।' तिसरा नेटकरी म्हणाला, 'लग्न कधी करताय.'


हेही वाचा : शाहरुखला सतत ओरडायचे 'कौन बनेगा करोडपती' चे निर्माते, किंग खाननं स्वत: सांगितलं 'हे' मोठं कार


पुलकित आणि क्रितीविषयी बोलायचे झाले तर गेल्या 4-5 वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी 'पागलपंती' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत. चित्रपटाचं प्रमोशन करत असताना त्या दोघांनी नात्याची कबूली दिली. दोघांनी 'वीरे दी वेडिंग' आणि 'तैश' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. 


लग्नावर काय म्हणाला होता पुलकित! 


पुलकितनं टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत क्रितीसोबतच्या लग्नाच्या प्लॅनिंगविषयी सांगितलं. त्यानं सांगितलं की 'माझं सोपं आहे, जो पर्यंत तुम्ही बेस्ट फ्रेंड्ससारख राहतात, तो पर्यंत सगळंच चांगलं सुरु असतं. त्यामुळे तुमच्यातील भांडणं आणि प्रेम हे मित्रांसारखं असतं. जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा दोन लोकांच्या नात्यात बदल होतात. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही बेस्ट फ्रेंड्स आहात, सगळं ठीक आहे. त्यामुळे कोणतंही स्ट्रेस का घ्यावं?