मुंबई : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि त्यांची सून अभिनेत्री ऐश्वर्या राय यांना एक वाईट सवय आहे. विशेष म्हणजे त्यांची ही सवय जया बच्चनपासून श्वेता बच्चन नंदापर्यंत सर्वांनाच सतावत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या या वाईट सवयीचा त्यांच्याच कुटुंबीयांनी पर्दाफाश केला. केबीसीमध्ये जया बच्चन यांनी कॉफी विथ करणमध्ये अमिताभ बच्चन आणि  ऐश्वर्याच्या या वाईट सवयीबद्दल नाराजी व्यक्त केली होती.


अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्याच्या या वाईट सवयीपूर्वी, दोघांमध्ये आणखी एक समानता आहे. अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या या दोघांनाही त्यांच्या आवाजामुळे त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये नाकारण्यात आलं होतं.


आकाशवाणीमधील न्यूज रीडरसाठी अमिताभ यांना नकार देण्यात आला होता, तर ऐश्वर्याला डबिंग आर्टिस्टसाठीही नकार देण्यात आला होता. अमिताभ आणि ऐश्वर्याची आणखी एक समानता किंवा वाईट सवय फोनशी संबंधित आहे.


जया बच्चन यांनी केबीसीमध्ये सांगितलं होतं की, अमिताभ कधीही फोन उचलत नाहीत किंवा मेसेजला उत्तरही देत ​​नाहीत. श्वेता बच्चननेही ऐश्वर्या रायची हिच तक्रार केली होती की, ती फोन उचलत नाही आणि मेसेजलाही उत्तरही देत ​​नाही. जया ते श्वेतापर्यंत दोघांनीही बीग बी आणि ऐश्वर्याला फोनबाबत बेफिकीर असल्याचं सांगितलं आहे.