मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या आगामी 'धाकड' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कंगना सध्या 'धाकड'च्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. कंगनाचा 'धाकड' हा सिनेमा 20 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या प्नमोशन दरम्यान कंगनाने काही बड्या कलाकारांवर नाराजी व्यक्त केली आहे.



 नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कंगनाला विचारण्यात आलं होतं की, इंडस्ट्रीतील प्रत्येकजण एकमेकांना खरंच सपोर्ट करतो का? यावर कंगनाचे विधान आश्चर्यचकित करणारे होते. अजय देवगणचे नाव घेत कंगना म्हणाली की, अजय देवगण माझ्या चित्रपटाचे प्रमोशन कधीच करत नाही. कंगना म्हणाली की, अजय इतर चित्रपटांचे प्रमोशन करतो मात्र माझ्या सिनेमाचं प्रमोशन कधीच करणार नाही.



याशिवाय, अक्षय कुमारबद्दल बोलताना कंगना म्हणाली, "अक्षय कुमारने मला फोन केला आणि सांगितले की मला तुझा 'थलायवी' चित्रपट खूप आवडला. त्याला माझा चित्रपट आवडला पण चित्रपटाचा ट्रेलर ट्विट केला नाही. अक्षयनं असं का केलं असावं याबद्दल जेव्हा कंगनाला विचारण्यात आलं तेव्हा तिने हसून उत्तर दिले की, अक्षयकडेच याचं उत्तर असेल.



याशिवाय कंगनाने मुलाखतीदरम्यान अमिताभ बच्चन यांचाही उल्लेख केला आणि सांगितले की, मिस्टर बच्चन यांनी माझ्या चित्रपटाचा ट्रेलर ट्विट केला आणि नंतर तो लगेच डिलीट केला. त्यांनी असं का केलं ते मला माहीत नाही. हा प्रश्न त्यांना विचारायला हवा.


कंगना रनौत तिच्या बिंधास्त बोलण्याने नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा बड्या कलाकारांना लक्ष्य करत ती चर्चेत आली आहे.