Kanika Maheshwari Divorce: काही वर्षांचा संसार आणि मग घटस्फोट! सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या प्रेमाची कहाणी ही अधूरीच राहिली आहे. 11 वर्षांचा प्रेमाचा संसार केल्यानंतर तिनं आपल्या पतीसोबत अखेर घटस्फोट घेतला आहे. त्यांच्या 8 वर्षांचा मुलगा देखील आहे. कनिका महेश्वरी हिनं आपल्या पतीसह घटस्फोट घेतला आहे. कनिकानं अनेक हिंदी मालिकांतून कामं केली आहेत. 'दीया और बाती हम' या लोकप्रिय मालिकेत तिनं मीनाक्षी भाभीची भुमिका साकारली होती. त्यापुर्वीही तिनं अनेक हिंदी मालिकांतून कामं केली आहेत. यापुर्वी आलेली तिची 'राजा की आएगी बरात' ही मालिकाही बरीच गाजली होती. या मालिकेतून मृणाल कुलकर्णी यांचीही महत्त्वाची भुमिका होती. या मालिकेतून कनिकानं राजकुमारी भूमीची भुमिका केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2012 साली तिनं कॉलेज स्वीटहार्ट अंकुरसोबत लग्न केले होते. काही महिन्यांपुर्वीच ते वेगळे झाले आहेत असं मीडिया रिपोर्ट्समधून कळते. तीन महिन्यांपुर्वी त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पुढच्या वर्षी त्यांना घटस्फोट मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती कळते आहे. ईटाईम्सच्या सूत्रांनुसार कनिका ही आपल्या पतीपासून गेल्या 4 वर्षांपासून वेगळी राहते आहे. सध्या कनिका आणि तिचा 8 वर्षांचा मुलगा नानक हे मुंबईत राहत आहेत तर अंकुर हा दिल्ली येथे राहतो आहे. असंही म्हटलं जात आहे की त्या दोघांनी या लग्नाला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु ते यशस्वी झाले नाहीत. त्या दोघांना जेव्हा समजले की त्यांचे नाते आता पुढे जाऊ शकत नाही तेव्हा मग त्यांनी एकमेकांसोबत असलेले नाते तोडण्याचा निर्णय घेतला आहे अशी प्राथमिक माहिती कळते आहे. 


असं म्हटलं जातंय की त्यांच्यात कुठल्याच गोष्टींवर एकमत होत नव्हते. त्याचसोबत त्यांच्यात लॉन्ग डिस्टंन्स रिलेशनशिप ठेवण्यातही ते यशस्वी झाले नाहीत. त्या दोघांनी सेलिब्रेटी डान्स रिएलिटी शो 'नच बलिये' सीझन 6 मध्ये एकत्र दिसले होते. 2013 साली हा शो प्रचंड लोकप्रिय झाला होता. सोबतच त्या दोघांनीही एकत्र कामं केली आहेत. त्यातून त्यांनी अनेक वेबसिरिजमधून एकत्र काम केले असून त्यांनी काही शॉर्ट फिल्म्सही प्रोड्यूस केल्या आहेत. 



अकुंरची वेगळीच माहिती : 


कनिका ही शेवटची दिल दिया गला. सध्या कनिकानं अद्याप आपल्या घटस्फोटाबद्दल काहीच खुलासा केलेला नाही. सध्या अकूंर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार असे कळते की त्याच्यामते या सर्व अफवा आहेत. अकुंर हा कामानिमित्त दिल्लीत राहतो आहे. तर कनिका ही मुंबईत आहे. त्याच्यात लॉन्ग डिस्टंस रिलेशनशिप आहे त्यामुळे या बातम्या पसरल्या असल्याचे तो म्हणतो आहे. आता यावर लवकरच पडदा पडले अशी शक्यता आहे.