मुंबई : कलाकार आणि विविध मुद्द्यांवर असणाऱ्या त्यांच्या भूमिका कायमत सर्वांच्या चर्चेचा विषय ठरतात. काही कलाकार प्रकर्षानं काही मुद्द्यांवर आपल्या ठाम भूमिका मांडत असतात. तर काही मात्र त्यांच्या वक्तव्यानं नव्या वादांना आमंत्रण देतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या वक्तव्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबाबत या अभिनेत्रीनं असं काही वक्तव्य केलं आहे की, ते ऐकून एका ठराविक वर्गाकडून तिला जोरदार विरोधाला सामोरं जावं लागत आहे. 


ही अभिनेत्री आहे रचिता राम. रचिता ही एक कन्नड अभिनेत्री आहे. 'लव्ह यू रच्चू' या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्तानं एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना तिने याबाबतचं वक्तव्य केलं. 


रचिताला तिच्या या वक्तव्यानंतर कन्नड क्रांती दलानं कडाक्याचा विरोध केला. इतक्यावरच न थांबता या संघटनेकडून अभिनेत्रीवर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली. 


सदर प्रकरणी रचितानं जाहीर माफी मागावी अशी मागणी या संघटनेकडून करण्यात येत आहे. 


नेमकं काय आहे प्रकरण? 
'डिंपल क्वीन' या नावानं ओळखल्या जाणाऱ्या रचिता राम हिला चित्रपटासाठीच्या एका पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांकडून सेन्शुअल सीनबद्दल प्रश्न विचारले. ज्यानंतर रचितानं रिपोर्टरलाच, तुम्ही लग्नानंतरच्या पहिल्या रात्री काय केलं होतं? असा प्रश्न केला.


इथं खुप सारेजण असे आहेत जे विवाहित आहेत. मला तुम्हाला खजील करण्याचा कोणताही हेतू नाही. पण, मी हेच विचारु इच्छिते की, लग्नानंतर लोकं काय करतात?, असा प्रश्न तिने केला. 



आपल्या या वादग्रस्त प्रश्नावर कोणी व्यक्त होण्यापूर्वीच रचितानंच याचं उत्तर देत, लग्नानंतर लोकं Romance च करणार ना, चित्रपटातही तेच दाखवण्यात आलं आहे, असं उत्तर देत परिस्थिती निभावून नेली. पण, आता मात्र तिला यासाठी रोषाचा सामनाही करावा लागत आहे.