मुंबई : बॉलिवूडचे आघाडीचे निर्माता करण जोहर, साजिद नाडियादवाला यांनी एका बिग बजेट सिनेमाची घोषणा केलीय. या सिनेमात बॉलिवूडमधील सहा सुपरस्टारदेखील असणार आहेत. या सिनेमामुळे आलिया भट्ट आणि वरुण धवन बदनाम होणार आहेत. होय... बॅक टू बॅक तीन सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर या जोडीवर आता कलंक लागणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल की या दोघांनी नेमकं असं काय केलं की त्यांना कलंक झेलावा लागणार आहे... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर या जोडीला कलंक लावलाय दिग्दर्शक करण जोहर यांनी... होय वरुण आणि आलियाच्या आगामी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आलीय. या सिनेमाच नाव आहे 'कलंक'... या सिनेमात वरुण आलियाशिवाय माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य राय कपूर मुख्य भूमिकेत असणार आहेत.


या चित्रपटाचं स्वप्न करण जोहर आणि त्याचे वडील यश जोहर यांनी 15 वर्षांपूर्वी पाहिलं होतं. मात्र, आता 15 वर्षांनंतर त्यांचं स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. करण जोहरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाची घोषणा करत सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित केलंय. या सिनेमात  साजन फेम जोडी संजय दत्त आणि माधुरी दीक्षित तब्बल 25 वर्षांनी पुन्हा एकत्र दिसणार आहेत. 


अभिषेक वर्मा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून 19 एप्रिल 2019 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.. सिनेमाच नाव भलेही 'कलंक' असलं तरी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणक्यात चालेल अशी आशा करायला हरकत नाही.