मुंबई : बिग बॉस 15 चं जेतेपद पटकवल्यानंतर तेजस्वीची आणखी एक चर्चा होत आहे. चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणायला हरकत नाही. बिग बॉसला लावलेला कौल तेजस्वीच्या बाजुनं, जेतेपदही मिळालं आणि आयुष्यभराचा जोडीदारही मिळाला का अशी आता चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. करण आणि तेजस्वी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार का? असा आता सर्वांना प्रश्न पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोघांना एकत्र पाहून चाहत्यांनाही मोठा आनंद झाला आहे. तेजस्वी आणि करण कुंद्रा बिग बॉसमुळे चर्चेत आले होते. तेजस्वी बिग बॉस 15 ची विजेती आहे. आता करण आणि तेजस्वी विवाह करणार असल्याची चर्चा रंगली आहे. 


करण कुंद्रा आणि तेजस्वी यांच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. करण आणि तेजस्वीने लवकरात लवकर लग्न करावे अशी त्यांची इच्छा आहे. करण कुंद्राच्या बाबांनी यावर आपलं मत दिलं आहे. एकूणच त्यांच्याकडून ग्रीन सिंग्नल असल्याचं दिसत आहे. 


करण-तेजस्वीच्या लग्नावर बाबा काय म्हणाले?
करण कुंद्राचे आई-वडील बिग बॉसच्या फिनालेमध्ये दिसले तेव्हा तेजस्वीनी आणि करणबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर करणच्या वडिलांनी तसं झालं तर मी लवकर लग्नासाठी परवानगी देईन असं म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल असल्याचं दिसत आहे. 



आता करण आणि तेजस्वी लग्नाबाबत काय निर्णय घेतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे दोघंही आता कधी चाहत्यांमध्ये याबाबत गुडन्यूज देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.