मुंबई : 'भारत' चित्रपटानंतर अभिनेत्री कतरिना कैफची बीटाऊनमध्ये चांगलीच चर्चा आहे. 'भारत'मध्ये कुमुज रैना ही भूमिका साकारल्यानंतर आता जाहिरात क्षेत्रात कतरिना कैफचा भाव वाढला आहे. जाहिरात क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी कतरिनाला ब्रॅंन्ड अॅम्बेसेडर बनवण्यासाठी विचारलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या कतरिना जवळपास डझनभर ब्रॅंन्डसोबत काम करत आहे. तसंच आणखी सहा कंपन्यांनी कतरिनाला ब्रॅंन्ड अॅम्बेसेडरसाठी विचारलं आहे. विविध क्षेत्रातील जाहिरात कंपन्यांनी कतरिनाला याबाबत विचारणा केली आहे. या जाहिरातींमध्ये ब्यूटी, फिटनेस, रियल स्टेट, टूरिझम, कार्स यांसारख्या अनेक ब्रॅंन्डसचा समावेश आहे.


इतकंच नाही तर कंपन्यांकडून कतरिनाला ४० टक्के अधिक मानधनही ऑफर केलं जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कतरिनाची ब्रॅंन्ड व्हॅल्यू अधिक आहे आणि सोशल मीडियावर फास्टेस ग्रोईंग सेलिब्रिटी म्हणून कतरिना अग्रगणी असल्याचं म्हटलं आहे.



'भारत'च्या दमदार बॉक्स ऑफिस कमाईनंतर कतरिना अक्षय कुमारसह आगामी 'सूर्यवंशी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' चित्रपटाचं शूटिंग सुरु असून 'सूर्यवंशी' पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.