मुंबई : बॉलिवूडमध्ये प्रत्येक दिवशी काही नाती जुळून येतात तर काही जोडपे नेहमीसाठी विभक्त होतात. एककाळ असा होता जेव्हा अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या नात्याची चर्चा तुफान रंगत होती. पण दोघांचं नात फार काळ टिकू शकलं नाही. कतरिना-रणबीरच्या ब्रेकअपच्या अनेक वेगवेगळ्या बातम्याही समोर आल्या. ब्रेकअपनंतर कतरिनाने त्याच्या रिलेशनशीप बद्दल अनेक गोष्टी उघडपणाणे सांगितल्या. यावेळी तिने त्यांच्या ब्रेकअपचं नक्की कारण सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मी नेहमीच खूप भावनिक आणि संवेदनशील राहिली. मी कोणालाही बदलण्याचा कधीही प्रयत्न केला नाही आणि मी ते करणारही नाही. एक स्त्री म्हणून मला एक गोष्ट शिकायला मिळाली की, आपण आपली ओळख कधीही गमावू नये. असं कतरिना एका मुलाखतीत म्हणाली. यासोबतच तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. 


'आपण या जगात एकटेच आलो आणि एकटेच जाणार आहोत. ही गोष्ट कुणीही विसरू नये. मी लोकांवर माझी इच्छा थोपवू शकत नाही, त्यांची निवड स्वतःची आहे, ज्यामुळे मला आनंद होत नाही.'  कतरिना कैफने मुलाखतीच्या शेवटी सांगितले की, 'मी रणबीरच्या कुटूंबात इतकी जवळ नव्हते जितकं मला रहायला पाहिजे होतं. आता जेव्हा मी लग्न करण्याचा निर्णय घेईन तेव्हा कुटुंब माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असेल. '


याशिवाय मीडियामध्ये अश्या बर्‍याच बातम्या समोर आल्या आहेत की, रणबीरची आई नीतू कपूरला कतरिना आवडत नव्हती. एवढेच नाही तर नीतू कपूर यांनी पार्टीमध्ये जाणं सुद्धा बंद केलं. जेथे रणबीरसोबत  कतरिनाचा सहभाग असायचा. सलमान खान देखील रणबीर-कतरिनाच्या ब्रेकअपचे एक कारण असल्याचे म्हटले जात आहे