मुंबई : अजय आणि काजोलची कहाणी जेव्हा दोघं प्रेमात पडले तेव्हा 'इश्क'मध्ये काम करत होते 'हलचल' चित्रपटाच्या सेटवर अजय देवगन आणि काजोल पहिल्यांदा भेटले. यापूर्वी दिव्या भारती या चित्रपटात काम करणार होती. पण त्यांच्या निधनानंतर काजोलला या चित्रपटात कास्ट करण्यात आलं होतं. जेव्हा काजोलने अजयला पहिल्यांदा 'हलचल'च्या सेटवर पाहिलं तेव्हा तिला आश्चर्य वाटलं. ती कायम हा माणूस कसा आहे याचा विचार करायची. दिवसभर एका कोपऱ्यात  बसून तो सिगारेट ओढायचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुणाशीही जास्त बोलायचा नाही. मात्र हळू-हळू हे दोघं बोलू लागले. अजय काजोलला डेटिंग टिप्स द्यायचा. त्यावेळी दोघेही वेगवेगळ्या रिलेशनशिपमध्ये होते. नंतर अजय आणि काजोल 'गुंडाराज' चित्रपटात दिसले. या चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटी, दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरवात केली होती.



गुंडाराजा' नंतर अजय 'इश्क' चित्रपट करत होता. या चित्रपटात अजय-आमिरसोबत माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. पण करिश्माने वैयक्तिक कारणास्तव अजयबरोबर काम करण्यास नकार दिला. मग माधुरीनेही या चित्रपटापटातून काढता पाय घेतला. इंदर कुमारचा हा पहिला चित्रपट होता, ज्यामध्ये माधुरी काम करत नव्हती. फायनली या चित्रपटात प्रमुख भूमिकेत जूही चावला आणि काजोल यांना निवडण्यात आलं होतं


'इश्क'मध्ये काम करत असताना अजय आणि काजोलला बर्‍याच वेळ एकत्र घालवण्याची संधी मिळाली. या गोष्टीमुळे दोघांनाही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी आणि वेळ मिळाला. दुसऱ्या नायकासोबत 'प्यार किया तो डरना क्या' आणि 'कुछ कुछ होता है' सारखे चित्रपट करण्याशिवाय काजोल अजयबरोबर सतत काम करत होती. 'इश्क' नंतर या दोघांनी 'प्यार तो होना था था', 'दिल क्या करे' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. 1999 मध्ये या दोघांचे लग्न झाले. त्यांच्या लग्नानंतर 'राजू चाचा' हा आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला.