मुंबई : माधुरी दीक्षित ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. माधुरीचे बहुतेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. 'धक-धक गर्ल्स' या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री माधुरी दीक्षितने करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक संघर्ष केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही तुम्हाला 32 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या माधुरी दीक्षितच्या 'प्रेम प्रतिज्ञा' या चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. या चित्रपटातील सीन पाहून तुम्हीही हादरून जाल. या चित्रपटात माधुरीचा सहकलाकार मिथुन चक्रवर्ती होता. 1989 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात विलानने माधुरीसोबत असं काही केलं होतं. जो आजही लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे.


माधुरी दीक्षितच्या या चित्रपटात विनोद मेहरा आणि रणजीत राय यांची खलनायक म्हणून निवड करण्यात आली होती.  हा अभिनेता बहुतेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता पण आजपर्यंत या चित्रपटातील सीन माधुरीच्या मनात घर करून गेले आहेत.  या चित्रपटात बलात्काराचे सीन चित्रीत केले जाणार होते.


ज्यासाठी माधुरी तयार नव्हती. या सीनमुळे माधुरी खूप घाबरली होती. मात्र दिग्दर्शकाच्या दबावानंतर तिने हा सीन करण्यास होकार दिला आणि त्यानंतर हा सीन करताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.


मिळालेल्या माहितीनुसार, हा बलात्काराचा सीन चित्रित होत असताना, प्रत्यक्षात अभिनेता रणजीतचा भ्रमनिरास झाला. सीन कट झाल्यानंतरही रणजीत थांबण्याचं नाव घेत नसून अभिनेत्री माधुरी दीक्षितवर जबरदस्ती सुरू केल्याचं बोललं जातं. रणजीतची ही कृती माधुरीला जाणवली आणि तिने त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. जर तू मला स्पर्श केलास तर मी तुझा हात तोडेन. माधुरीने रणजीतलाही कानशिलात लगावल्याचं सांगण्यात येतं.