मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या बोल्डनेस आणि अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर अनेक वर्षांनी ती उघडपणे बोलली आहे. मलायका अरोराने खुलासा केला आहे की, तिचा माजी पती अरबाज खानसोबतचं तिचं नातं अधिक चांगलं झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायका आणि अरबाजने डिसेंबर 1998 मध्ये लग्न केलं आणि लग्नाच्या 18 वर्षांनंतर मे 2017 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. आता दोघंही आपापल्या आयुष्यात व्यस्त आहेत.मलायका अरोरा अर्जुन कपूरला डेट करत आहे. तर अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघंही मिळून १९ वर्षांचा मुलगा अरहान खानला वाढवत आहेत. मलायकाने अलीकडेच सांगितलं की, जेव्हा ते वेगळे झाले तेव्हा तिची आणि अरबाजची चांगलं बॉन्डिंग होतं.


तिला अरबाज खानशी मैत्री राहील का, असं विचारले असता? मलायका म्हणाली, ''आमचे समीकरण आता चांगलं आहे. आम्ही अधिक  मेच्योर आहोत. तो एक अद्भुत व्यक्ती आहे, मी फक्त त्याला शुभेच्छा देऊ शकते.''


ती पुढे म्हणाली, "आयुष्यात कधी कधी माणसं अद्भुत असतात पण ते एकत्र महान नसतात, इतकंच. मी नेहमी त्याच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देते." तिने लग्न संपवण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले, "मला वाटते की मी माझी निवड वेगळी झाली आणि मी स्वतःला प्रथम स्थान देते. आणि मला असं वाटते की मी आज एक चांगली व्यक्ती आहे. माझ्या मुलाशी माझं चांगलं नातं आहे, तो पाहतो की मी खूप आनंदी आहे. माझे माझ्या एक्स पतीसोबत चांगले संबंध आहेत. मी हा निर्णय घेतला आणि तो माझ्या बाजूने उभा राहिला याचा मला आनंद आहे.''