मुंबई : भारतात आता कोरोनाचा कहर वाढत आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. या महामारीचा वाढता धोका पाहता यूएके, हॉन्ग कॉन्ग, कनाडा, सिंगापुर, ईरान  सारख्या देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. आता या यादीत मालदीवचा देखील समावेश आहे. मालदीव पर्यटन विभागाने रविवारी सकाळी हा आदेश जाहीर करत भारतीय पर्यटकांवर काही दिवसांची बंदी घातली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक कलाकार मालदीवला सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. यामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt), रणबीर कपूर (Ranbir Kapoor), दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, दिशा पटानी (Disha Patani), टाइगर श्रॉफ (Tiger Shroff), जाह्नवी कपूर, सारा अली खान, दीया मिर्झा यासारख्या कलाकारांचा समावेश आहे. (कोरोनाच्या काळात मालदीवमध्ये फिरणाऱ्या कलाकारांवर शोभा डे भडकल्या) 


 


यातील अनेक कलाकार मालदीव वरून पुन्हा परतताना एअरपोर्टवर दिसत आहे. या कलाकारांवर आता मजेशीर मीम्स तयार करण्यात आले आहेत. 



आलिया कपूर आणि रणबीर कपूर कोरोनामुक्त झाल्यावर दोघंही मालदीवला गेले होते. हे दोघं मुंबई एअरपोर्टवर परतले असून आता त्यांच्यावर मीम्स तयार होत आहेत.



गेलेल्या कलाकारांनी परत या म्हणणार हे मजेशीर मीम्स



बॉलिवूड स्टार म्हणतात मला आता जगण्याची इच्छाच नाही.