Dharmaveer 2 : गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर बहुचर्चित ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर लाँच इव्हेंट इतका भव्य होता की या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात अनेक मराठीच नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. गोविंदा, जितेंद्र, बोमन इराणी, अशोक सराफ  यांच्यासोबतच बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खाननेसुद्धा ट्रेलर लाँचला उपस्थित होता. मात्र, आठवडा झाला तरी या सोहळ्याची चर्चा थांबायचं नाही घेत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या इव्हेंटवरून आता एका मराठी अभिनेत्यानं केलेली फेसबुकवर पोस्ट चर्चेत आली आहे. ही पोस्ट ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सलमान खानच्या उपस्थितीवरून आहे. ही पोस्ट अभिनेता किरण माने यांनी केली आहे. "छ. शिवरायांनी सर्व जातीधर्मांचा आदर करणारं हिंदुत्व शिकवलंय आपल्याला. हिंदुत्व म्हणजे मुस्लीमद्वेष नव्हे." हे पटत नव्हतं ना? हा घ्या ढळढळीत पुरावा... 'हिंदुत्वाची गोष्ट' सांगणार्‍या सिनेमाच्या प्रमोशनला सुद्धा वन ॲन्ड ओन्ली, 'द सलमान खान' हा अस्सल पठाण लागला! भारी वाटलं. धर्म ठेकेदारांना सलमानभाईच्या मागेपुढे करताना बघून लै लै लै भारी वाटलं.'



खरंतर हा  ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन त्याचं स्वागत केलं. या दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे पुत्र व  खासदार श्रीकांत शिंदेसुद्धा मंचावर उपस्थित होते. चित्रपटाच्या ट्रेलरद्वारे ‘धर्मवीर 2’मध्ये साहेबांचं हिंदुत्व हा विषय अधोरेखित केला जाणार असं दिसून येत आहे. मग त्यांना ट्रेलर लाँच साठी पठाण म्हणजेच सलमान खान का लागतो असा सवाल किरण मानेंनी म्हटलं आहे. अभिनेते किरण माने कायमच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात. आतादेखील किरण माने यांच्या टीकात्मक पोस्टला नेटकरी लाईक्स आणि कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. 


हेही वाचा : बॉलिवूडच्या 'या' 5 अभिनेत्यांच्या Extra Marital Affair ला पत्नींची होती मान्यता?


‘धर्मवीर 2’  हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. याविषयीची माहिती देत निर्माते मंगेश देसाई यांनी राज्यात होत झालेल्या अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचं कारण दिलं आहे. ‘धर्मवीर 2' हा 2022 मध्ये रिलीज  झालेल्य 'धर्मवीर' या आनंद दिघेंच्या आयुष्यवर आधारित चित्रपटाचा पुढचा भाग आहे. 'धर्मवीर' चा हा पहिला भाग सुपरहिट ठरला होता. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटानं चांगली कमाई केली होती. प्रवीण तरडेंनीच या दोन्ही भागांचं लेखन, दिग्दर्शन केलं असून अभिनेता प्रसाद ओक या भागात देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मात्र, याआधीच्या भागात आनंद दिघे यांचा मृत्यू झाल्याचे दाखवले असल्याने या भागात आनंद दिघे यांच्या मृत्यूमागच खरं दाखवलं जाणार की नाही याबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.