मुंबई : मिस्टर इंडिया चित्रपट बनवायचा होता, आणि त्यासाठी श्रीदेवी अभिनेत्री हवी होती. यासाठी लेखक जावेदसाहेब आणि बोनी कपूर, श्रीदेवीला फिल्म ऑफर करण्यासाठी चेन्नईला गेले होते.


श्रीदेवीच्या आईने सांगितलं जरा वाट पाहा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोन केल्यावर श्रीदेवीच्या आईने सांगितलं जरा वाट पाहा, कारण तेव्हा श्रीदेवी दुसऱ्या चित्रपटासाठी व्यस्त होती, तीन चार दिवस गेल्यानंतरही श्रीदेवीकडून चर्चेसाठी कोणताही फोन आला नाही.


जावेद साहेबही होते चिंतेत


अशावेळी जावेदसाहेब जरा चिंतेत होते, की चर्चाच होत नाही, तर श्रीदेवी भूमिका स्वीकारणार तरी कशी आणि तिच्याशिवाय आणखी हा रोल कुणाला द्यायचा किंवा आता काय करता येईल. 


बोनी कपूरला देखील याची मोठी चिंता होती, कारण मिस्टर इंडियाक़डून त्यांना मोठी अपेक्षा होती, हा बिग बजेट सिनेमा होता.


दहाव्या दिवशी श्रीदेवीला वेळ मिळाला


चेन्नईत बोनी कपूर श्रीदेवीच्या बंगल्याच्या चकरा मारत होते, अखेर दहाव्या दिवशी श्रीदेवीला वेळ मिळाला, तिला स्क्रिप्ट आवडली आणि तिला कहाणी आवडली आणि चित्रपट साईन करण्यास ती राजी झाली.