अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नाळ चित्रपटातील उत्तम कामगिरी मधून महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहचलेला अमरावती मधील बाल कलाकार श्रीनिवास पोकळे उर्फ चैत्या यांच्या घरी सुध्दा गणेश उत्सव मोठ्या आनंदात सुरू आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी चैत्याने यंदाही पर्यावरण पूरक अशा मातीच्या गणपती स्थापणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना मूळे गणेश उत्सव मोठया प्रमाणात साजरा करण्यासाठी निर्बंध असल्याने यंदा मौज मजा करता येणार नसल्याची नाराजी चैत्या ने व्यक्त केली सोबत कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांनी साध्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा करण्याच आवाहनही त्यानं केलं आहे.



सध्या सर्व सेलिब्रिटी हे लॉक डाऊन मूळे घरी राहून वेळ घालवत आहे. नाळ या चित्रपटात उत्तम अभिनयातून घराघरात पोहचलेला अमरावती मधील बालकलाकार श्रीनिवास पोकळे उर्फ चैत्या हा सुध्दा घरीच आहे. तो कुटुंबासोबत राहून सध्या मोठ्या आनंदात गणपती उत्सव तो साजरा करतोय. 



मागील वर्षी धूम धडाक्यात गणपती उत्सव आम्ही साजरा केला. परंतु या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने सरकारचे नियम पाळूनच गणपती उत्सव साजरा करत असून घरी पर्यावरण पूरक मातीचा गणपती बसविल्याची माहिती चैत्याने दिली. सुरवातीला लॉकडाऊन कडक असल्याने घरी करमत नव्हते परंतु आता ऑनलाइन शाळा सुरु झाल्याने वेळ चांगला जातो अस चैत्या सांगतो. दरम्यान आता चैत्या सायकल फिरवून सुट्याचा आनंद घेताना दिसत आहे.